TRENDING:

Spirituality : चकवा म्हणजे काय आणि तो कोणाला लागतो? कारण अंगावर काटा आणणारं

Last Updated:
Chakva Mhanje Kay : चकवा लागणे हा शब्द तुम्ही ऐकला असेल, अनेकांनी हा अनुभवला देखील असेल, गावच्या ठिकाणी किंवा शांत रस्त्यावर असा प्रकार बहुतांश घडतात असं सांगितलं जातं.
advertisement
1/12
Spirituality : चकवा म्हणजे काय आणि तो कोणाला लागतो? कारण अंगावर काटा आणणारं
रात्रीच्या वेळी किंवा भर दुपारी हा चकवा लागतो अशी मान्यता आहे. पण चकवा लागणं म्हणजे काय किंवा हे नक्की का आणि कोणासोबत होतं हे माहितीय का?
advertisement
2/12
अनेकांचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी भूतं असतात किंवा एखादी निगेटिव शक्ती असते, तिथे लोकांना चकवा लागतो. यावेळी आपली दिशाभूल होते. ज्यामुळे समोर असलेला रस्ता ही आपल्याला दिसत नाही आणि आपण चुकीच्या रस्त्यावर जातो. हा अनैसर्गिक प्रकार आहे.
advertisement
3/12
एखाद्या ठिकाणी अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला, पण अशा अचाक आलेल्या मृत्यूने त्यांचे मन भटकत असते आणि त्यांचा आत्मा मुक्त होत नाही, त्यामुळे ते तिथेच फिरत राहतात. त्यांच्यामुळे लोकांना चकवा लागतो अशी देखील मान्यता आहे.
advertisement
4/12
पण भूतप्रेत शिवाय यामागे काही नैसर्गिक कारणं असल्याचे देखील काही कारणं समोर आली आहेत. तज्ज्ञांच्या मते याचा संबंध वनस्पतीशास्त्राशी आहे.
advertisement
5/12
आता तुम्ही असा तर अनुभव घेतला असणार की काही ठरावीक ठिकाणी गेल्यावर तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवते. तर काही ठिकाणी नकारात्म उर्जा जाणवते. अशाच प्रकारची गोष्ट चकवा लागण्यासाठी कारणीभूत असते.
advertisement
6/12
Chakva Mhnje Kay-चकवा म्हणजे काय? रानावनात पडणारा चकवा किंवा पडणारी ‘रानभूल’ म्हणजे पानाफुलांतील, वृक्षवेलींतील अज्ञात गूढ शक्तीचा अनुभव! रानभुलीला तशी अनेक नावं आहेत. आदिवासी याला ‘झोटिंग’ अथवा ‘सावडीत’ म्हणतात आणि त्याला भुताखेताचा प्रकार मानतात.
advertisement
7/12
पण तो अंधश्रद्धेचा विषय नाही.- काही झाडांच्या संपर्कात आल्यास, काही वेगळंच चैतन्य जाणवू शकतं. मनाची बैचनी थांबते. उदा. उंबर आणि कोजाब (वटवृक्ष कुळातलं एक झाड). जंगलातल्या अनेक वृक्षवेलींमध्ये, झाडाझुडपांमध्ये अनेक प्रकारची शक्ती आहे. ती आपल्या जाणिवेच्या पलीकडे असल्यामुळे गूढ वाटते.
advertisement
8/12
अनेक वृक्षवल्लींत पंचेंद्रियांची गूढ शक्ती असते. अर्थात त्या शक्तीची जंगलात येणाऱ्या प्रत्येक परक्याचं अस्तित्व ही घूसखोरी वाटल्यामुळे त्यांना ती सहन होत नाही. आपल्याला उपद्रव व इजा करण्यासाठीच कुणीतरी आलेलं आहे अशी झाडांची समजूत होते. मग ते स्वसंरक्षणासाठी प्रतिक्षिप्त क्रिया करतात.
advertisement
9/12
काही वृक्षवेली आपण त्यांच्या जवळपास जाताच पानाफुलांतून उग्र गंध सोडून त्रस्त करून सोडतात. त्या उग्र गंधाचा परिणाम सौम्य किंवा तीव्र भूल दिल्यासारखा होतो. परिणामी प्राणिमात्रांना गुंगी येते.
advertisement
10/12
प्रत्येकाच्या मनोबलानुसार कमी-जास्त प्रमाणात स्मृतिभ्रंश होतो. त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्ती, दिशा यांचं भान राहात नाही. आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत, कुठे जायचं आहे, हे कळेनासं होतं. मेंदू बधिर होतो आणि मागे, पुढे, डावीकडे, उजवीकडे जाण्याचा रस्ता सापडत नाही. फिरून फिरून व्यक्ती त्याच जागेवर येते. हीच रानभूल! किंवा चकवा!
advertisement
11/12
पण चकवा, रानभूल हा अंधश्रद्धेचा विषय नाही, ती एक नैसर्गिक अरण्यशक्ती आहे. या शक्तीच्या अस्तित्वाचे संकेत रानभुलीसारख्या अनुभवातून मिळतात.
advertisement
12/12
नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Spirituality : चकवा म्हणजे काय आणि तो कोणाला लागतो? कारण अंगावर काटा आणणारं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल