IND vs ENG : मरीन ड्राईव्हवरून आला इशारा, इंग्लंडला कळालाच नाही,मुंबईकर असल्याचा सूर्याला फायदा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघासाठी हा महत्वाचा सामना आहे. कारण जिंकणारा संघ थेट फायनलला पोहोचणार आहे.
advertisement
1/7

टी20 वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमी फायनल सामना खेळवला जातो आहे. या सामन्याला आता काही मिनिटात सूरूवात होणार आहे.
advertisement
2/7
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघासाठी हा महत्वाचा सामना आहे. कारण जिंकणारा संघ थेट फायनलला पोहोचणार आहे.
advertisement
3/7
या सामन्याचा टॉस इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.
advertisement
4/7
या सामन्यात टॉस आधीच टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवला मरीन ड्राईव्ह वरून एक इशारा आला होता. हा इशारा इंग्लंडचा कॅप्टन हॅरी ब्रुकला कळालाच नाही. त्यामुळे सूर्याला फायदा मिळाला आहे.
advertisement
5/7
त्याचं झालं असं आहे की मरीन ड्राईव्ह जवळ वानखेडेचे मैदान असल्याने प्रचंड वारं सुटलं आहे.त्यामुळे सूर्याला आज फलंदाजीच करायची होती. कारण मैदानावर प्रचंड वारं सुटलं होतं.त्यामुळे दव पडणार नाही, हा इशारा सूर्याला मरीन ड्राईव्हवरून मिळाला होता.
advertisement
6/7
विशेष म्हणजे ही गोष्ट हॅरी ब्रुकला कळालीच नाही आणि त्याने टॉस जिंकून मुर्खपणा केला. कारण त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
advertisement
7/7
खेळपट्टी चांगली दिसतेय, आशा आहे की आम्ही चेंडूने चांगली सुरुवात करू शकू. भारतीय संघाला या मैदानावर खेळण्याचा आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. टी-२० क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, इथे कधी काय होईल सांगता येत नाही. आशा आहे की आम्ही भारतीय चाहत्यांना शांत ठेवू शकू, असे हॅरी ब्रुक टॉस दरम्यान म्हणाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ENG : मरीन ड्राईव्हवरून आला इशारा, इंग्लंडला कळालाच नाही,मुंबईकर असल्याचा सूर्याला फायदा