IND vs NZ T20i : दोन मॅच झाल्या पण एक चूक कुणाच्याच लक्षात आली नाही; सूर्यकुमारही म्हणेल अरेच्चा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs New Zealand T20 : न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजमध्ये संजू आणि अभिषेक शर्मा सलामीला आले पण एक चूक दोन्ही सामन्यात त्यांनी केली. त्यामुळे न्यूझीलंडच्या बॉलर्सने सुरूवातीच्या पावरप्लेमध्ये वर्चस्व गाजवलं. ती चूक नेमकी काय होती? जाणून घ्या.
advertisement
1/7

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका खेळवली जात आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवल्यानंतर आत तिसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचं स्वप्न टीम इंडियाचं आहे.
advertisement
2/7
शुभमन गिल याला खराब फॉर्ममुळे संघातून बाहेर करण्यात आलं तर दुसरीकडे संजू सॅमसन याने त्याची जागी घेतली. त्यामुळे संजू आणि अभिषेक शर्मा आता सलामीला येतात. पण याच दोघांनी मागील दोन्ही सामन्यात चूक केलीये.
advertisement
3/7
न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजमध्ये संजू आणि अभिषेक शर्मा सलामीला आले पण एक चूक दोन्ही सामन्यात त्यांनी केली. त्यामुळे न्यूझीलंडच्या बॉलर्सने सुरूवातीच्या पावरप्लेमध्ये वर्चस्व गाजवलं. ती चूक नेमकी काय होती? जाणून घ्या.
advertisement
4/7
दोन्ही सामन्यात असं दिसून आलंय की, संजू सॅमसन पहिली स्ट्राईक घेतोय. दरवेळी ही जबाबदारी अभिषेक शर्माकडे असायची. पण संजू पहिल्या ओव्हरमध्ये डिफेन्सिव खेळत असल्याचं दिसल्याने विरोधी संघ प्रेशर तयार करतोय.
advertisement
5/7
पहिली स्ट्राईक मिळाल्यावर अभिषेक सुरूवातीलाच बॉलला प्रेक्षकांचं दर्शन घडवतो. त्यामुळे नॉन स्ट्राईकवर संजू बॅटिंगला आपल्यावर आक्रमक खेळ सुरू करतो. त्यामुळे टीम इंडियाला चांगली सुरूवात मिळू शकते.
advertisement
6/7
टीम इंडियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर पहिल्या पावर प्लेमध्ये संजू आणि अभिषेक यांचा तिखट मारा गरजेचा आहे. त्यानंतर सूर्या आणि तिलक उर्वरित काम करून जातील.
advertisement
7/7
दम्यान, टीम इंडियाची बॅटिग ऑर्डर तगडी असल्याने भारतीय संघ यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार देखील आहे. न्यूझीलंडच्या कॅप्टनच्या मनात देखील हीच भीती त्याने पोस्ट मॅचमध्ये बोलून दाखवली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ T20i : दोन मॅच झाल्या पण एक चूक कुणाच्याच लक्षात आली नाही; सूर्यकुमारही म्हणेल अरेच्चा!