IND vs NZ : वर्ल्डकप फायनल सारखी बॅटींग गडगडली, गोलंदाजीतही निराशा,टीम इंडियाच्या पराभवाचे पाच व्हिलन
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
राजकोटमध्ये पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने भारतचा 7 विकेटने पराभव केला आहे. या विजयासह न्यूझीलंडने तीन वनडे सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाला पाच कारणे कारणीभूत ठरली आहे.
advertisement
1/7

राजकोटमध्ये पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने भारतचा 7 विकेटने पराभव केला आहे. या विजयासह न्यूझीलंडने तीन वनडे सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाला पाच कारणे कारणीभूत ठरली आहे.
advertisement
2/7
भारताने दिलेल्या 284 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डेरी मिचेलने 101 धावांची शतकीय आणि विल यंगने 87 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. या खेळाडूंच्या बळावर न्यूझीलंडने हा सामना सहज जिंकला होता.
advertisement
3/7
दुसऱ्या वनडेत टीम इंडियाच्या पराभवाला पाच कारणे कारणीभूत ठरली आहेत. पहिलं कारण म्हणजे वर्ल्डकप फायनल सारखी टीम इंडियाची बॅटींग गडगडली. रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर सारखे खेळाडू स्वस्तात बाद झाले.
advertisement
4/7
न्यूझीलंडकडून दुसरा सामना खेळणाऱ्या क्रिस्टिअन क्लार्कने रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या तिघांची महत्वाची विकेट काढली होती. त्यामुळे स्विंग बॉल समोर टीम इंडियाचे खेळाडू पुन्हा फेल ठरताना दिसले आहेत.
advertisement
5/7
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने दुसऱ्या वनडेत फारशा धावा दिल्या नाही, पण त्याला जास्त विकेट काढता आल्या नाही. यासोबत त्याने फिल्डींग करताना कॅच ड्रॉप देखील केली होती. ही कॅच जर त्याने घेतली असती तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.
advertisement
6/7
टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाचे हे होमग्राऊंड आहे. या होमग्राऊंडवर तो फलंदाजीत फ्लॉप ठरला. तर गोलंदाजीतही तो फारशी कामगिरी करू शकला नाही.
advertisement
7/7
तसेच टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज कुलदीप यादव या सामन्यात सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे.कारण त्याने 10 ओव्हरमध्ये 82 धावा दिल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : वर्ल्डकप फायनल सारखी बॅटींग गडगडली, गोलंदाजीतही निराशा,टीम इंडियाच्या पराभवाचे पाच व्हिलन