Chanakya Niti : चाणक्यनीतीतील 5 नियम, मोडले तर उद्ध्वस्त होईल आयुष्य
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya Niti In Marathi : चाणक्य नीतीमध्ये सांगितलेले हे नियम मोडणं म्हणजे आनंद आणि शांती गमावणं. हे नियम तुमचं जीवन बदलू शकतात.
advertisement
1/6

एखाद्याशी नातं निर्माण करणं खूप सोपं आहे पण ते आयुष्यभर टिकवणं खूप कठीण आहे. आचार्य चाणक्य यांनी नात्यांबद्दल असे 6 नियम सांगितले होते जे आजच्या युगातही खूप प्रासंगिक आहेत. जर कोणी हे नियम मोडले तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही.
advertisement
2/6
चाणक्य म्हणतात की कोणत्याही नात्याचा पाया विश्वासावर आधारित असतो. जर विश्वास एकदा तुटला तर ते नातं कधीच पूर्वीसारखं राहू शकत नाही. म्हणूनच नात्यात प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता राखणं खूप महत्त्वाचं आहे.
advertisement
3/6
कधीकधी एखाद्या व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी असलेलं नातं इतकं वाढतं की त्यांच्यातील जवळीक आवश्यकतेपेक्षा जास्त वाढते. पण अशी जवळीक कधीकधी नात्यात दरी निर्माण करते. त्यामुळे अशी जवळीक टाळाल.
advertisement
4/6
तुमच्या कठीण काळात जो तुमच्यासोबत उभा राहत नाही अशा व्यक्तीकडून तुम्ही कोणत्याही अपेक्षा ठेवू नयेत. चाणक्य मानतात की अशा लोकांपासून अंतर ठेवणं चांगलं.
advertisement
5/6
चाणक्य म्हणतात की कधीही आपल्या नात्याची तुलना दुसऱ्या कोणाशी करू नये. कारण बऱ्याचदा मत्सरही यातून निर्माण होतो. हीच गोष्ट हळूहळू नातं नष्ट करते.
advertisement
6/6
जे तुमचं भलं करतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं महत्त्वाचं आहे. चाणक्य यांच्या मते, कृतज्ञता न दाखवणं ही मानवी चारित्र्याची कमजोरी आहे.