Hindu Tradition : कुणाचा मृत्यू झाला की पांढरे कपडे का घालतात? काय आहे याचं महत्त्व
- Published by:Priya Lad
Last Updated:
Hindu Tradition : हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारावेळी लोक पांढरे कपडे घालतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पांढरे कपडे घालण्याची ही परंपरा का पाळली जाते?
advertisement
1/5

तुम्ही पाहिलं असेल कुणा सेलिब्रिटीचा मृत्यू झाला की इतर सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला पांढरे कपडे घालून येतात. फिल्ममध्येही तुम्ही अंत्यसंस्कार किंवा शोकसभेच्या सीनमध्ये असेच पांढरे कपडे घातलेले कलाकार पाहिले असतील. पण एखाद्याच्या मृत्यूनंतर इतर लोक पांढरे कपडे का घालतात याचा कधी विचार केला आहे का?
advertisement
2/5
अंत्यसंस्काराच्या वेळी पांढरे कपडे घालण्याची परंपरा सनातन धर्मात जुनी परंपरा आहे. त्यामागे धार्मिक महत्त्व आणि श्रद्धा आहे.
advertisement
3/5
असं मानलं जातं की मृत्यूनंतर आत्मा एक नवीन प्रवास सुरू करतो, म्हणून पांढरे कपडे घालून कुटुंबातील सदस्य वातावरण शांत आणि शुद्ध ठेवतात, जेणेकरून दिवंगत आत्म्याला शांती मिळू शकेल.
advertisement
4/5
हिंदू धर्मात सत्य, ज्ञान आणि सुसंवाद हे जीवनाचे तीन प्रमुख गुण मानले जातात आणि पांढरा रंग याच गुणांचं प्रतिनिधित्व करतो. पांढरा रंग शांती, पवित्रता आणि आध्यात्मिक उर्जेचं प्रतीक आहे असं मानलं जातं.
advertisement
5/5
पांढरे कपडे घालण्याचा उद्देश मनाला शांत करणं आणि दुःखाच्या वेळी कुटुंबाला मानसिक आधार देणं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Hindu Tradition : कुणाचा मृत्यू झाला की पांढरे कपडे का घालतात? काय आहे याचं महत्त्व