ऐतिहासिक घटनेला 356 वर्षे पूर्ण
छत्रपती शिवरायांच्या जीवनातील आग्र्याहून सुटका या ऐतिहासिक प्रसंगाला इतिहासात अतिशय महत्त्व आहे. शिवाजी महाराज आग्रा येथून 17 ऑगस्ट 1666 साली सुटले होते. आग्रा येथून निघून महाराज मथुरा, प्रयागराज, वाराणसी, गया, कटक, हैदराबाद, मलखेड, विजयपूर, गोकर्ण, पन्हाळा आणि राजगड किल्ला असे तेराशे किलोमीटर अंतर तेरा दिवसांमध्ये पार करुन राजगडावर 30 ऑगस्ट रोजी पोहचले होते. या घटनेला यावर्षी 356 वर्ष पूर्ण झाली आहेत.
advertisement
7 पिढ्यांची संगीत परंपरा असलेल्या महाराष्ट्र शाहीर कसा झाला जगभर फेमस?
पुणेकर तरुणांची अनोखी मानवंदना
शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी पुणे ते शिवनेरी राईड आयोजित केली जाते. मोशी येथील गोडाऊन चौक येथून सकाळी सहा वाजता सदर सायकल राईडला झेंडा दाखवून सुरुवात झाली. एका दिवसामध्ये तब्बल 100 किलोमीटर अंतर पाच ते सहा तासांमध्ये पार केले, असे आयएएसचे सदस्य गजानन खैरे यांच्यातर्फे सांगण्यात आले.
32 देश आणि 30 हजार किलोमीटर आणि 120 दिवस! पुणेकर कुटुंब कारनं गाठणार लंडन
कसा होता मार्ग?
पुणे ते शिवनेरी सायकल मार्ग - नाशिक फाटा - राजगुरुनगर - मंचर - नारायणगाव - शिवनेरी असा होता. अष्टविनायका मधील लेण्याद्री करून सर्व सायकलस्वार ओझर येथे मुक्कामसाठी गेले आणि दुसऱ्या दिवशी याच मार्गावरून परतीचा प्रवास झाला.