उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका हा सगळ्यांना महाराष्ट्राला सर्वश्रूत होता. सकाळी ६ वाजेपासून अजितदादा हे विकास कामाच्या कार्यक्रमांना हजर राहत होते. एक वेळेस अधिकारी पोहोचणार नाही, पण अजितदादा हे कार्यालयात आधी पोहोचले असायचं. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरावर अजितदादांचं विशेष लक्ष होतं. त्यामुळे शहरातील कोणत्याही कामासाठी सदैव हजर राहायचे. अलीकडेच झालेल्या पुण्यातील बजाज सायकल ग्रँड टूरचं यशस्वी आयोजन झालं. पुण्यातील सगळे रस्ते हे गुळगुळीत आणि चकाचक झाले होते. खुद्द अजित पवार यांनी अभिनेता आमिर खान याच्यासोबत या कार्यक्रमाला आले होते. यावेळी अजितदादांनी सोशल मीडियावर ट्वीट केलं होतं.
advertisement
अजित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले होते की, " क्रीडा क्षेत्रात सर्व सुविधा उपलब्ध करून देणं, खेळाडूंना प्रोत्साहित करणं तसंच राज्याची आणि देशाची ओळख जागतिक स्तरावर उंचावणं, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.! " असं म्हणत अजितदादांनी क्रीडा क्षेत्रासाठी सदैव काम करत राहणार, असं आश्वासन दिलं होतं.
तसंच, पत्रकारांनी जेव्हा पुण्यातील रस्ते हे चांगले झाले आहे ते रस्ते आता असेल राहणार आहे ना, असं विचारलं असता अजितदादा मिश्किलपणाने म्हणाले की, 'बरोबर आहे, पुणेकरांच्या आवाहनाला नक्की प्रतिसाद देऊ, पालिका निवडणुकीत पुणेकरांनी एवढा कमी प्रतिसाद दिला की, आता बघावं लागणार आहे, आता गंमतीचा भाग जाऊ द्या. आता मतदारराजा काय ठरवायचं असेल ते मानायचं असतं. मी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोलतो. बांधकाम खात्याच्या लोकांशी बोललो आहे. काम करा, पण ती अशी करा, असं सांगितलं आहे. रस्ते इतके चांगले आहे की वाहतुकीची कोंडी झाली आहे. आम्हाला जास्त काम करावं लागणार आहे, ते आम्ही जास्त काम करू' असं आश्वासन अजितदादांनी दिलं होतं.
