मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या मुंबई-नागपूर-मुंबई, मुंबई-रत्नागिरी-मुंबई, मुंबई-चिपळूण-मुंबई, तसेच इतर महत्त्वाच्या मार्गांवर धावणार आहेत. दरवर्षी होळीच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नियमित गाड्यांवर प्रचंड ताण येतो. ही गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
Mumbai Local: मुंबईकर रविवारी खोळंबा होणार, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, कधी आणि कुठं, पाहा सविस्तर
advertisement
भारतीय रेल्वेने देशपातळीवर होळीनिमित्त 1 हजार 410 विशेष गाड्या चालविण्याची योजना आखली असून, त्यामध्ये मध्य रेल्वेचा वाटा जवळपास दोनशेहून अधिक गाड्यांचा आहे. यंदा प्रवासी सुविधांवर विशेष भर देण्यात आला असून, विविध स्थानकांवर पुरेशा संख्येने तिकीट काउंटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच ऑनलाईन तिकीट बुकिंग व्यवस्थेलाही अधिक सक्षम करण्यात आले आहे.
पुणे हे मध्य रेल्वेतील महत्त्वाचे केंद्र असल्याने येथून उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. दरवर्षी होळीच्या काळात पुण्यातून हजारो प्रवासी दानापूर, गोरखपूर, मुझफ्फरपूर आदी ठिकाणी जातात. ही वाढती मागणी लक्षात घेऊन पुणे-दानापूर, पुणे-गोरखपूर आणि पुणे-मुझफ्फरपूर मार्गावर अधिक फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेळेआधी तिकीट आरक्षण करण्याचे आवाहन केले असून, अधिकृत रेल्वे संकेतस्थळ व ॲपद्वारेच तिकीट काढण्याचे सुचविले आहे. होळी सणाच्या काळात सुरक्षित, सोयीस्कर आणि तणावमुक्त प्रवासासाठी मध्य रेल्वे सज्ज असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.






