IT मधील तरूणांना आता एसबीआयमध्ये काम करण्याची संधी, घसघशीत मिळणार पगार
परभणी जिल्ह्यातील आयटी इंजिनिअर अशोक देशमाने यांनी अवघ्या 26 व्या वर्षी दोन लाख रुपयांच्या पगाराची नोकरी सोडून महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे मायबाप होण्याचा निर्णय घेतला.2015 साली त्यांनी ‘स्नेहवन’ या संस्थेची स्थापना केली. येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा सांभाळ केला जातो. शिक्षणापासून ते राहण्यापर्यंत सर्व काही या ठिकाणी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. दोन खोल्यांमध्ये 18 मुलांना घेऊन लावलेले हे स्नेहवनचे रोपट आज 180 मुलांना मायेची सावली देत आहे.आळंदीपासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर वडगाव घेनंद रोडवर ही ‘स्नेहवन’ संस्था आहे.
advertisement
मुलांच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न
स्नेहवन संस्थेत अशा सोयी-सुविधा आहेत की एखाद्या आंतरराष्ट्रीय शाळेलाही लाजवतील. येथे शिक्षणाबरोबरच मुलांना ज्या गोष्टीत आवड आहे त्या क्षेत्राचे प्रशिक्षण दिले जाते. एखाद्या मुलाला शेतीची आवड असेल तर त्याला प्रत्यक्षात शेती कशी करायची हे शिकवले जाते. तर एखाद्याला संगणकाची आवड असल्यास त्याला संगणकासंबंधी सर्व आवश्यक ज्ञान दिले जाते. परदेशातील अनेक तरुण - तरुणी स्नेहवनमध्ये शिकवायला येतात.शाळेव्यतिरिक्त मल्लखांब, बुद्धिबळासह योगा, संगीत, कथक नृत्य, पाककला, शेती, दूध उत्पादन असे अनेक प्रकारचे प्रशिक्षण मुलांना दिले जाते. तसेच, अकाउंटिंग, प्रशासन, व्यवस्थापन आणि संभाषण याचे धडेही तज्ज्ञांकडून मुलांना दिले जातात.
हार्बर मार्गावर जम्बोब्लॉक, वाहतूक पूर्णपणे बंद; कोणत्या मार्गावर असणार ब्लॉक?
दोन खोल्यांमध्ये सुरू झालेला स्नेहवन आता दोन एकर परिसरात विस्तारलेला आहे. सुरुवातीला केवळ पत्र्याच्या छपराखाली असलेल्या छोट्या इमारतीतून सुरुवात झालेली ही संस्था आज तीन नवीन इमारतींसह उभी आहे. संस्थेच्या आवारात वाचनालय, प्रयोगशाळा, गोशाळा अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत.फक्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठीच नाही, तर वंचित मुलांच्या शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारीदेखील स्नेहवनने स्वीकारली आहे.