TRENDING:

Weather Alert : अंगाची लाही लाही होणार, राज्यात उष्णतेचा कहर सुरूच, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा येलो अलर्ट

Last Updated:

राज्यात उष्णतेचा कहर सुरूच आहे. उत्तर कोकण, मराठवाड्यातील उत्तरेकडचे जिल्हे तसेच विदर्भातील तब्बल चार जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेसाठी येलो अलर्ट दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : राज्यात उष्णतेचा कहर सुरूच आहे. नागपूरमध्ये तब्बल 44 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचल्याचे पाहायला मिळाले तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील तापमानाचा पारा हा 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. पुण्यामध्येही तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. उत्तर कोकण, मराठवाड्यातील उत्तरेकडचे जिल्हे तसेच विदर्भातील तब्बल चार जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेसाठी येलो अलर्ट दिला आहे. पाहुयात 22 एप्रिल रोजी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हवामान तसेच तापमानाची स्थिती कशी असेल.
advertisement

राज्याची राजधानी मुंबईसह कोकण किनारपट्टीतील यामध्ये उष्ण आणि दमट हवामान पाहायला मिळत आहे. उत्तर कोकणातील पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेचा येलो अलर्ट दिला आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगर मधील कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.

advertisement

Egg Benefits : गावरान की बॉयलर, कोणती अंडी खाणे तब्येतीसाठी चांगली? कशातून मिळत शरीराला जास्त प्रोटीन? Video

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातही तापमानाचा पारा हा 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. पुण्यामध्ये 22 एप्रिल रोजी कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये ढगाळ हवामान राहणार असून पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात.

advertisement

विदर्भामध्ये मात्र कमाल तापमानाचा उच्चांक पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये 22 एप्रिल रोजी कमाल तापमान तब्बल 45 अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना उष्णतेसाठी येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? VIdeo
सर्व पहा

वाढत्या उष्णतेच्या या काळामध्ये नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलके कपडे परिधान करावेत तसेच दुपारी 11 ते 4 या वेळेमध्ये घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Weather Alert : अंगाची लाही लाही होणार, राज्यात उष्णतेचा कहर सुरूच, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा येलो अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल