रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पासाठी 8,970 कोटी रुपयांचे डीपीआर तयार करण्यात आले आहे. नवीन मार्गामुळे चाकण औद्योगिक वसाहत थेट रेल्वे मार्गाशी जोडली जाणार आहे. स्थानिक प्रशासन आणि तज्ज्ञांच्या चर्चेनंतर हा प्रस्ताव जीएमआरटी या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाद्वारे तयार करण्यात आला आहे. या बदलामुळे उद्योग क्षेत्रातील मालवाहतूक जलद आणि सुरळीत होईल, तसेच प्रवासाचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
advertisement
मार्गात बदल करण्यामागचं कारण काय?
रेल्वे मार्ग जीएमआरटी या आंतरराष्ट्रीय खगोल-निरीक्षण केंद्राच्या परिसरातून जाणार असल्याने विज्ञान-तंत्रज्ञान विभाग आणि अणुऊर्जा विभागाने त्यावर आक्षेप नोंदवला होता. रेल्वे लाइनमुळे दुर्बिणीची निरीक्षण प्रक्रिया बाधित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने या प्रकल्पासाठी नवीन पर्यायी मार्गाचा आराखडा तयार करण्यात आला. या बदलामुळे पुणे–नाशिक तसेच पुणे–अहिल्यानगर या मार्गांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे कनेक्टिव्हिटीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे.
संगमनेर वगळलं
पुणे आणि नाशिक हा मार्ग आता शिर्डी आणि अहमदनगर मार्गे जाणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून या मार्गावर असणारे संगमनेर शहर वगळण्यात आले आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.






