नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, समीर नेहाल खान (वय २८) आणि त्याचा मित्र एसपी मुरलीधर कुमार (वय २०, रा. तळवडे) हे दोघे शुक्रवारी (१६ जानेवारी) सायंकाळी सातच्या सुमारास कामावरून दुचाकीने घरी परतत होते. पुनावळे येथील गायकवाड नगर परिसरात आले असता, समोरून येणाऱ्या अग्निशमन दलाच्या गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
advertisement
या भीषण अपघातात समीर खान हा गंभीररीत्या जखमी झाला होता. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. फिर्यादी मुरलीधर कुमार हे देखील या अपघातात जखमी झाले आहेत. संशयित चालक वैभव रमेश कोरडे (वय ३२, रा. मुळशी) याने अग्निशमन दलाची गाडी बेदरकारपणे आणि वेगात चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक आरोप आहे.
चालकावर गुन्हा दाखल: याप्रकरणी मुरलीधर कुमार यांनी रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी सरकारी वाहनावरील चालक वैभव कोरडे याच्यावर निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आपत्कालीन सेवेतील गाड्यांना वेगाची सूट असली, तरी भरवस्तीत गाडी चालवताना सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले गेल्याने एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याची भावना स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
