शिरूर लोकसभेचा घाट ते दिल्ली ही शर्यंत कोण जिंकणार?
अमोल कोल्हे सलग दुसऱ्यांदा खासदार होणार की शिवाजी आढळराव खासदारकीचा चौकार मारणार? यावरून तर्क-वितर्क लढवले जातायेत. अशातच गेल्या लोकसभेतील आणि यंदाच्या लोकसभेतील झालेली मतदानाच्या टक्केवारीवरून ही वेगवेगळे अंदाज बांधले जातायेत.
#शिरूर लोकसभेतील विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी
विधानसभा 2024 2019
जुन्नर 58.16% 64.65%
advertisement
आंबेगाव 62.95% 70.13%
खेड-आळंदी 57.76% 62.20%
शिरूर 56.91% 61.45%
हडपसर 49.41% 57.45%
भोसरी 47.71% 47.84%
राज्यातील राजकारणाची घसरलेली पातळी. नेत्यांनी सोडलेली तत्व, निष्ठा आणि स्वाभिमान पाहून मतदारांचा राजकारण्यांवरील उडालेला विश्वास, सोबतचं शिरूर लोकसभेतील उन्हाचा तडाखा आणि अवकाळी पावसाचा व्यत्यय, यामुळं मतदानाची टक्केवारी घसरली. शिरुर लोकसभा मतदार संघात 2019 ला 60.62 टक्के मतदान झाल होत. ते 2024 ला 54.16 पर्यंत खाली आलं. म्हणजे थेट 6 टक्क्यांनी मतांची घसरण झाली. आता या ना त्या कारणाने मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्या मतदारांचा फटका कोणाला बसणार यावरून चर्चांना उधाण आलंय.
टक्का घसरला,फायदा कोणाला?
मतदानाचा टक्का घसरला की चिंता ही सत्ताधाऱ्यांची वाढते, असा आजवरचा अनेकांचा अभ्यास सांगतो. मागच्या वेळी कोल्हेंना निवडून आणणारी मंडळी यावेळी आढळराव यांचा प्रचार करत होती तर आढळरावांची ताकत असलेले पारंपारिक शिवसैनिक मात्र कोल्हेच्या बाजूने होते. त्यातच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील अपघातामुळे मतदार संघात फिरले नाही. त्याचाही कोल्हे ना फायदा होईल. देशात आणि राज्यात असलेली मोदी विरोधी लाट यामुळे अमोल कोल्हे सलग दुसऱ्यांदा शिरूर लोकसभेचा घाट गाजवतील आणि दिल्लीत तुतारी फुंकतील, असं बहुतांश राजकीय अभ्यासकांचं मत आहे.