बाहेर आलेला गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हा करू नये म्हणून त्यांना नोकरी मिळवून देतात ,त्यांनी 190 कुटुंबांना शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेतलं असून, गुन्हेगारीकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांचं समुपदेशनही केलं जातं. त्याच्या याच कार्याविषयी उदय जगताप यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
उदय जगताप यांनी सांगितलं की, शिक्षा पूर्ण करून सुटलेल्या आणि सुधारण्याची इच्छा असलेल्या कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास मदत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. किरकोळ गुन्हे किंवा जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या कैद्यांना नव्या आयुष्याची सुरुवात करता यावी, उदरनिर्वाहासाठी चांगली नोकरी मिळावी, यासाठी आदर्श मित्रमंडळ काम करत आहे. आदर्श मित्रमंडळाने पुण्यात सुरू केलेल्या दत्तवाडी पॅटर्नद्वारे शाळांमध्ये मुलांचे समुपदेशन केले जाते. तसेच, जेलमध्ये शुभम करोति कल्याणम, पसायदान आणि इतर समुपदेशक उपक्रमांमुळे गुन्हेगारीत मोठी घट झाली आहे.
advertisement
उदय जगताप यांनी सांगितले की, दत्तवाडीतील गुन्ह्यांची संख्या वर्षभरात 325 वरून 192 वर कमी झाली. पोलिसांनीही या पॅटर्नचे कौतुक केले असून, इतर पोलीस ठाण्यांमध्ये देखील हा पॅटर्न राबवण्यात येत आहे. पूर्वी हत्यारं, तलवारी किंवा कोयते हाताळणाऱ्या हातांनी आता व्यवसाय आणि कला असे तंत्र आत्मसात केले आहे. उदय जगताप यांनी सांगितले की, आदर्श मित्रमंडळाद्वारे गुन्हेगारांच्या 190. कुटुंबांना शैक्षणिक गोष्टीसाठी दत्तक घेतल गेलं आहे. तसेच, गुन्हेगारीकडे आकर्षित होणाऱ्या मुलांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि समुपदेशन केले जाते, ज्यामुळे स्थानिक स्तरावर गुन्हेगारीत लक्षणीय घट होण्यास मदत होते.