हिंदू धर्मातील महापुराण मानल्या जाणाऱ्या गरुड पुराणात जन्म आणि मृत्यूशी संबंधित अनेक रहस्ये सांगण्यात आली आहेत. यामध्ये पाप-पुण्य आणि कर्माचा हिशोब देखील सांगितला आहे. कोणत्या गोष्टी केल्यानं मनुष्य नरकात जातो आणि कोणत्या कृती त्याला मोक्ष प्राप्त करण्यास मदत करतात, याचा उल्लेख आहे. भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन पक्षी राजा गरुड यांच्यातील संवादावर आधारित गरुड पुराणात असे म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीनं आपल्या आयुष्यात 4 गोष्टी केल्या तर त्याचा आत्मा मृत्यूनंतर मोक्षाकडे जातो. म्हणजे आत्म्यासाठी मोक्षाचे दरवाजे उघडतात. थोडक्यात जाणून घेऊया या 4 गोष्टींबद्दल..
advertisement
कोणती गोष्टी माणसाला मोक्ष प्राप्ती देतात -
- भगवान विष्णूला तुळशी अत्यंत प्रिय आहे. गरुड पुराणात, तुळशीचे वर्णन आपल्याला परमधामात नेणारी म्हणूनही केले आहे. एखाद्या व्यक्तीनं तुळशीच्या रोपाची नित्य पूजा केली तर त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. याशिवाय मरणासन्न व्यक्तीच्या तोंडात तुळशीची पाने टाकल्यानं त्याच्यासाठी मोक्षाचे दरवाजे उघडतात, असे मानले जाते.
आता भाग्य उजळणार! जून महिन्यातील ग्रहांचे राशीपरिवर्तन या 4 राशींना पैसा देणार
- गरुड पुराणानुसार, व्यक्तीने नेहमी श्री हरी नामाचा जप केला पाहिजे. तसेच शेवटच्या क्षणी नारायणाचे नाव घेऊन त्यांच्या दशावतारांची पूजा केल्यानंही मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते.
- हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार एकादशीचे व्रत मोक्ष देणारे मानले जाते. एकादशी व्रताचे महत्त्व गरुड पुराणातही सांगण्यात आलं असून त्यानुसार जो व्यक्ती एकादशीचे व्रत करतो, त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्षही प्राप्त होतो.
- गरुड पुराणानुसार, कलियुगात गंगा स्नान केल्यानं माणसाची पापे नष्ट होतात आणि त्याच्यासाठी मोक्षाचे दरवाजे उघडतात.
हेकेखोर की मनमिळावू? जन्मतारीख सांगेल कसा आहे समोरच्या व्यक्तीचा स्वभाव
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
