TRENDING:

Ganesh Chaturthi 2025: बाप्पाची आरती तशी सोप्पी, पण, तुम्ही अशा चुका तर करत नाही ना?

Last Updated:

Ganesh Chaturthi 2025: गणपती असो किंवा इतर देवता, त्यांची आरती करताना प्रत्येकाकडून काही छोट्या-छोट्या चुका होतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती: येत्या 27 ऑगस्ट रोजी घराघरात लाडका बाप्पा विराजमान होणार आहे. बाप्पाचं जल्लोषात आगमन झाल्यानंतर दहा दिवस त्याची पूजाअर्चा केली जाते. नैवेद्यासाठी बाप्पाला आवडणारे पदार्थ बनवले जातात. सर्वात महत्वाचं म्हणजे दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरोघरी आरती केली जाईल. आरती करताना प्रत्येकाकडून काही छोट्या-छोट्या चुका होतात. त्या चुका नेमक्या कोणत्या? त्या कशा सुधाराव्यात, याबाबत पुजारी येलकर महाराज यांनी लोकल 18ला माहिती दिली आहे.
advertisement

आरतीची वेळ कोणती असावी? 

पुजारी येलकर महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरतीची वेळ ही सकाळी सूर्योदयानंतर 6 ते 8 वाजेपर्यंत असावी. यावेळेत आरती करणं शक्य न झाल्यास दुपारी 12 वाजण्याच्या आत आरती करून घ्यावी. संध्याकाळी सूर्यास्तानंतर 6.30 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान गणपतीची आरती करावी. पूजेसाठी शारीरिक आणि मानसिक शुद्धी महत्वाची आहे. त्यामुळे प्रसन्न आणि फ्रेश झाल्यानंतरच आरती करायला घ्यावी.

advertisement

Ganesh Chaturthi 2025: याला म्हणतात परंपरा आणि व्यवसायाची सांगड, पुण्यात इथं बनतात लाखो मोदक

आरती कोणत्या दिशेने फिरवावी? 

आरती सुरू करण्याआधी गणपतीला दुर्वा, फुलं, हार अर्पण करावेत. त्यानंतर नैवेद्य अर्पण करावा आणि नंतर आरतीला सुरुवात करावी. आरतीमधील दिवा तूप किंवा तेलाचा असावा. आरती ही नेहमी देवाच्या उजव्या बाजूने आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवावी. गणपतीची आरती म्हणताना त्यातील शब्दोच्चार व्यवस्थित असावा. आरती पाठ नसल्यास पुस्तकात बघून म्हणावी. आरतीचा क्रम चुकता कामा नये. आरतीचे शब्द अर्धवट किंवा चुकीचे उच्चारू नये.

advertisement

आरती झाल्यानंतर काय करावं? 

आरती झाल्यानंतर आरतीचा दिवा घरात सर्वांनी ओवाळून घ्यावा. हात जोडून प्रार्थना करावी. त्यानंतर प्रसाद वाटणे, देवाला नमस्कार करणे आणि कपाळाला कुंकू लावणे ही परंपरा पाळली पाहिजे. आरती झाल्यानंतर लगेच उठून जाऊ नये किंवा गडबड करू नये.

कोणतीही पूजा करताना किंवा आरती करताना भक्तिभाव महत्त्वाचा असतो. पण, शिस्तही तितकीच गरजेची असल्याचं येलकर महाराज म्हणाले. गणेशोत्सव हे केवळ जल्लोषाचं नव्हे, तर श्रद्धेचे आणि शिस्तीचंही पर्व आहे. आरती हे भक्ती व्यक्त करण्याची अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे आरती करताना या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून आपण आपल्या भक्तीला अधिक पवित्र रूप देण्याचा प्रयत्न करावा.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाची आरती तशी सोप्पी, पण, तुम्ही अशा चुका तर करत नाही ना?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल