काय आहे महत्त्व?
हिरवा रंग हा सृष्टीचे प्रतीक असून श्रावण महिन्यात वर्षा ऋतू सुरू असल्याने या महिन्यात निसर्ग अधिक हिरवागार झालेला असतो. सृष्टीला आणि दृष्टीला हा हिरवा रंग आनंद देतो. उत्तर भारतात तृतीयेपासून दोलोत्सव सुरु होतो. हा दोलोत्सव पार्वती देवीचा उत्सव मानला जातो. या उत्सवात पार्वतीला निसर्गातील फुल, फळ आणि पानांपासून सजवलं जातं. तिला झोपाळ्यावर बसवून झोका दिला जातो त्यालाच दोलोत्सव असे म्हणतात. ही प्रथा उत्तर भारतात आहे. त्यावेळी सौभाग्याचे लक्षण म्हणून हिरव्या बांगड्या भरल्या जातात. कोकणात देखील तृतीयेला गौरीची पूजा केली जाते.
advertisement
श्रावणातील पूजा साहित्यांवर 60% सूट; एकाच ठिकाणी करा सर्व वस्तूंची खरेदी
हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतीक आहे. म्हणून बुधाचा खडा पाचू देखील हिरव्या रंगाचा असतो. बुद्धीला प्रेरणा मिळते आणि आनंद वाढवतो. हा रंग सुखदायी असल्याचे मानले जाते.
श्रावण महिन्यात शंकराला शिवामूठ का वाहतात? कसे करतात हे व्रत? Video
काचेच्या हिरव्या बांगड्याच का?
काच ही वाळूपासून बनवली जाते. वाळू हे हे एक सृष्टीतील प्रतिक आहे त्यामुळे काचेच्या बांगड्यांचे महत्त्व अधिक आहे. बांगड्या घातल्यानंतर त्यांच्या हालचालीमुळे रक्ताभिसरण चांगले राहते. स्त्रियांच्या कोमल हाताला भारदस्तपणा येतो असे सांगितले जाते, अशी माहिती जोशी यांनी दिली.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)