धाराशिव : 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारीमध्ये झालेला भूकंप हा आजही संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आहे. या भूकंपात बलसुर गावात मोठी पडझड झाली होती. मात्र, येथील ग्रामदैवत श्री निळकंठेश्वराचे मंदिर अगदी जसंच्या तसंच राहिले. याच मंदिराबाबत आपण जाणून घेऊयात.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बलसुर येथील ग्रामदैवत श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर या मंदिराची ही कहाणी आहे. 1993 च्या महाप्रलयकारी भूकंपात गावाला हादरा बसला होता. मात्र, हे मंदिर अगदी ज्या स्थितीत होते, त्याच स्थितीत दिमाखात उभे राहिले आहे.
advertisement
Pola 2024 : बैलपोळा सण उत्साहात साजरा, पण हा सण नेमका कशासाठी साजरा केला जातो?
वर्षभर असते भाविकांची मोठी गर्दी -
या मंदिरात वर्षभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार यानिमित्त आज हे मंदिर गजबजलेले पाहायला मिळाले. निळकंठेश्वराचे हे हजारो वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडी आहे. त्यावर सुंदर कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे. हेमाडपंथी असलेल्या निळकंठेश्वर मंदिरासमोर एक मोठी दगडी बारव देखील आहे.
जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या या निळकंठेश्वर महादेव मंदिरात लोक भक्ती भावाने दर्शनासाठी येतात. वर्षभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. हे मंदिर प्राचीन आणि हेमाडपंथी शैलीचे आहे. 1993 साली महाप्रलयकारी भूकंपात संपूर्ण गाव भुईसपाट झाले. गावाचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन झाले. मात्र, त्यावेळी या मंदिराला काहीही झाले नाही. त्यामुळे निळकंठेश्वराचं हे मंदिर ग्रामदैवत म्हणून आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.