काय आहे अनोखी आख्यायिका?
गावातील ग्रामस्थ बैरंग सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाभारत काळात पांडवांना वनवास भोगावा लागला होता. कुरुक्षेत्रानंतर पांडव विविध ठिकाणी फिरत असताना ते कोथाळे परिसरात आले होते. त्या काळात या भागात तीव्र पाण्याची टंचाई होती. पांडवांसोबत असलेल्या कुंती मातेला तहान लागल्याने त्यांनी गावकऱ्यांकडे पाण्याची मागणी केली.
भीक मागून नव्हे, आम्ही कष्टाचं खातो; अंध दाम्पत्याचा खास बिझनेस, कमाई नको जिद्द बघा, Video
advertisement
मात्र त्या वेळी येथे पाण्याची उपलब्धता नसल्याने त्यांना पाणी मिळू शकले नाही. असे सांगितले जाते की, याच ठिकाणी कुंती मातेने देह ठेवला. या घटनेच्या स्मरणार्थ पुढे येथे कुंती मातेचे मंदिर उभारण्यात आले, अशी आख्यायिका स्थानिकांमध्ये प्रचलित आहे.
आजही या मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असून दरवर्षी येथे मोठ्या उत्साहात यात्रा भरवली जाते. या यात्रेदरम्यान सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भजन, कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यामुळे कोथाळे गावातील श्री कुंती माता मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून स्थानिकांच्या सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे.





