महाशिवरात्री का साजरी केली जाते?
पौराणिक कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. काही मान्यतांनुसार याच दिवशी भगवान शंकरांनी तांडव नृत्य केले होते. तसेच देव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून हालाहल विष बाहेर आले होते. सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकरांनी हे विष प्राशन केले. या घटनेनंतर त्यांचा कंठ निळा झाल्याने भगवान शिवांना नीलकंठ असे म्हटले जाते. महाशिवरात्री हा भक्ती, संयम आणि आत्मशुद्धीचा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान शंकरांची पूजा, उपवास आणि जागरणाला विशेष महत्त्व दिले जाते.
advertisement
महाशिवरात्रीनिमित्त मोठा निर्णय, घारापुरीसाठी विशेष जलसेवा, तिकीट दर आणि वेळापत्रक
महादेवांची पूजा कशी आणि कधी करावी?
महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा दिवसभर करता येते. मात्र धार्मिक परंपरेनुसार रात्रीचा काळ शिवपूजेसाठी अधिक महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः मध्यरात्रीचा वेळ, म्हणजेच निशिता काळ, हा शिवपूजेसाठी शुभ समजला जातो. अनेक ठिकाणी संध्याकाळपासून पहाटेपर्यंत चार प्रहरांत शिवपूजा करण्याची परंपरा आहे. पूजा करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान केले जातात. शिवलिंगावर पाणी किंवा दूध अर्पण करून बेलपत्र, फुले, धूप आणि दीप अर्पण केले जातात. ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करून आरती केली जाते.





