ओमानच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंडिया ए ची सुरूवात खराब झाली. प्रियांश आर्या 6 बॉलमध्ये 10 रन आणि वैभव सूर्यवंशी 13 बॉलमध्ये 12 रन करून आऊट झाला, पण त्यानंतर हर्ष दुबे आणि नमन धीरने ओमानच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. ओमानकडून जय ओडेड्रा, शफीक जान, समय श्रीवास्तव आणि आर्यन बिष्ट यांना एक-एक विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
ओमानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार जितेश शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर भारताने ओमानला 20 ओव्हरमध्ये 135/7 वर रोखलं. वसीम अलीने 45 बॉलमध्ये नाबाद 54 रन केले. तर हमाद मिर्झाने 16 बॉलमध्ये 32 रनची खेळी केली. भारताकडून सुयश शर्मा आणि गुरजापनीत सिंग यांना 2-2 विकेट मिळाल्या. तर विजयकुमार वैश्यक, हर्ष दुबे आणि नमन धीर यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
इंडिया सेमी फायनलमध्ये
आशिया कप रायजिंग स्टारच्या स्पर्धेत इंडिया ए चा युएईविरुद्ध विजय झाला तर पाकिस्तानविरुद्ध भारताला पराभवाचा धक्का बसला, त्यामुळे सेमी फायनलला पोहोचण्यासाठी भारताला ओमानविरुद्ध विजय गरजेचा होता. ओमानला हरवून इंडिया ए ने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताची सेमी फायनल शुक्रवार 21 नोव्हेंबरला खेळवली जाईल. सेमी फायनलमध्ये भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध होण्याची शक्यता आहे.
