मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ५ विकेट गमावल्या होत्या. टीम इंडियावर फॉलोऑनचे संकट होते. तिसऱ्या दिवशी भारताने ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा याची विकेट गमावली तेव्हा संघाने २२१ धावा केल्या होत्या. अशात नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ऐतिहासिक भागिदारी करून ऑस्ट्रेलियाला फक्त धक्का दिला नाही तर भारताला मॅचमध्ये परत आणले.
advertisement
नितीश कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी आठव्या विकेटसाठी १२७ धावांची भागिदारी केली. या दोघांच्या भागिदारीत कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षाच्या इतिहासात आजवर कधीही न झालेल्या विक्रमांची नोंद झाली. कसोटी क्रिकेटमध्ये आजवर कधीच आठव्या आणि नवव्या क्रमांकावरील फलंदाजाने १५० हून अधिक चेंडू खेळले नाहीत. हा अनोखा विक्रम कुमार आणि सुंदर यांच्या नावावर झाला आहे. सुंदरने १६२ चेंडूत ५० धावा केल्या. तर कुमार १७६ चेंडूत १०५ धावांवर खेळत आहे.
ऑस्ट्रेलियात ८व्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता. इतक नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात कमी वयात शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कुमार तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे.
