भारताच्या पुरुषांच्या क्रिकेटमध्ये जसे नेतृत्व बदलाचे वारे वाहतात, असेच वारे महिला संघात फिरण्याची शक्यता आहे. कारण भारताची माजी कर्णधार शांता रांगास्वामी यांनी हरमनप्रीत कौरला कर्णधार पद सोडावे असे सुचवले आहे. आणि तिच्या जागी स्मृती मानधनाने जबाबदारी घ्यावी,असे आवाहन केले आहे.त्यामुळेच हरमनप्रीत कौरची कॅप्टन्सी काढुन घेतली जाणार असल्याची चर्चा आहे.
भारतीय क्रिकेटच्या दीर्घकालीन फायद्यासाठी हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडावे. कर्णधारपद सोडल्यानंतर हरमनप्रीत मदत होईल.जी फलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून संघाच्या सर्वात मौल्यवान संपत्तीपैकी एक आहे,असे शांता रंगास्वामी यांनी सांगितले.
advertisement
फलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून हरमन हुशार आहे. पण रणनीतिकदृष्ट्या, ती कधीकधी अडखळू शकते. "जर तिच्यावर कर्णधारपदाचा भार नसेल तर ती अधिक योगदान देऊ शकते असे मला वाटते,असे देखील शांता रंगास्वामी यांनी पीटीआयला सांगितले.
भारताचे भविष्य लक्षात घेऊन हा निर्णय घेतला पाहिजे.कारण 2029 मध्ये होणारा पुढील एकदिवसीय विश्वचषक आणि पुढील वर्षी युकेमध्ये होणारा टी20 विश्वचषक. हा पाहता 29 वर्षीय स्मृती मानधना यांना सर्व फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी द्यावी,असे देखील शांता रंगास्वामी यांनी सुचवले.
अशा यशानंतर (वर्ल्ड कप विजयानंतर) जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा ते चांगले घेतले जाणार नाही.परंतु भारतीय क्रिकेटच्या हितासाठी आणि हरमनच्या स्वतःच्या हितासाठी, मला वाटते की ती कर्णधारपदाच्या ओझ्याशिवाय फलंदाज म्हणून बरेच काही योगदान देऊ शकते.तिच्याकडे अजूनही तीन-चार वर्षे मोठे क्रिकेट खेळणे बाकी आहे. कर्णधार नसल्यामुळे ती ते करू शकेल. तसेच स्मृतीला सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार बनवले पाहिजे. तुम्हाला भविष्यातील विश्वचषकांसाठी देखील नियोजन करावे लागेल,असे शांता रंगास्वामी यांनी सांगितले.
जर असे झाल्यास ज्याप्रमाणे रोहित शर्माकडून वनडेच कर्णधार पद काढून घेतलं गेलं,त्याप्रमाणे हरमनप्रीत कौरकडून देखील कर्णधार पद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे.
