India vs South Africa Final : आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कपवर टीम इंडियाने नाव कोरलं आहे. साऊथ आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत भारताने फायनल जिंकली होती. या सामन्यात अनेक टर्निग पॉईंट आले होते. पण कर्णधार हरमनप्रीतच्या मते त्या दोन ओव्हर गेम चेंजर ठरल्या होत्या.या दोन ओव्हरमध्ये काय घडलं होतं? आणि या ओव्हर कुणी टाकल्या होत्या. हे जाणून घेऊयात.
advertisement
सामन्यानंतर बोलताना हरमनप्रीत कौरने भारताच्या विजयाची टर्निंग पॉईंट सांगितला. जेव्हा लॉरा व्होल्वार्डट आणि सुने लुस फलंदाजी करत होत्या, तेव्हा त्या खरोखरच छान खेळत होत्या. या दोघींची जोडी तोडणे गरजेचे होते.त्यावेळी मला शेफाली तिथे उभी असलेली दिसली. तिने ज्या पद्धतीने आधी फलंदाजी केली होती.ती पाहता आजचा दिवस तिचा होता. त्यामुळे माझे मन मला सांगत होते तिला एक ओव्हर देऊ या,असे हरमनप्रीत कौरने सांगितलं.
मी माझ्या मनाचं ऐकलं आणि तिला विचारलं ती तयार आहे का? तिने लगेच हो म्हटले. तिला नेहमीच बॉलनेही योगदान द्यायचे होते.त्यामुळे तिला गोलंदाजी देतात सर्व काही बदलले. तिने तिच्या पहिल्याच ओव्हरमध्ये सु्ने लुसची पहिल्यांदा विकेट काढली.त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये तिने मेरीजन कॅपची विकेट घेतली.अशाप्रकारे तिने विकेट काढून मॅच फिरवली असे हरमनप्रीतने सांगितले.
हरमनप्रीत पुढे म्हणाली, जेव्हा ती पहिल्यांदा संघात सामील झाली, तेव्हा आम्ही तिला सांगितले की तिला दोन किंवा तीन षटके टाकावी लागतील. ती म्हणाली, "जर तुम्ही मला चेंडू दिला तर मी संघासाठी दहा टाकेन!" ती इतकी आत्मविश्वासू आहे. ती निर्भय, सकारात्मक आणि संघासाठी पाऊल उचलण्यास नेहमीच तयार आहे,असे कौतुक हरमनप्रीतने तिचे केले.
कसा रंगला सामना
भारताने दिलेल्या 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेकडून कर्णधार लौरा व्होल्वार्ड एकटीच लढत होती.या दरम्यान तिने आपले शतकही पुर्ण केले होते. त्यानंतर ती आफ्रिकेला सामना जिंकून देईल असे वाटत असताना तिची विकेट पडली. दिप्ती शर्माच्या बॉलवर व्होल्वार्डने मोठा शॉर्ट खेळला होता.हा बॉल इतका उंचावर होता की कॅच पकडणे खूपच अवघड होते. पण अमनज्योतने पहिल्या प्रयत्नात बॉल पकडतान उडाला, दुसऱ्यांदाही तेच झालं पण तिसऱ्यांदा तिने कॅच पडकली आणि भारतासाठी सर्वात धोकादायक ठरणारी व्होल्वार्ड 101 धावांवर आऊट झाली. ही कॅच घेताच अख्खी मॅच फिरली.आणि टीम इंडियात झटपट उरलेले विकेट काढत आफ्रिकेला 246 वर ऑलआऊट करत 52 धावांनी सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधाना आणि शेफाली वर्माने चांगली सूरूवात केली होती.दोन्ही खेळाडूंनी यावेळी 100 धावांची पार्टनरशीप केली होती. अशाप्रकारे वर्ल्ड कपमध्ये शतकीय भागिदारी करणारा ही पहिलीच जोडी ठरली होती.त्यावेळी दोन्हीही खेळाडू अर्धशतकाच्या नजीक होत्या. मात्र त्याच दरम्यान स्मृतीच्या बॅटीला कड लागली होती,त्यामुळे बॉल थेट विकेटकिपरच्या हातात गेला होता. अशाप्रकारे स्मृती मानधना 58 बॉलमध्ये 45 धावा करून बाद झाली होती.या खेळीत तिने 8 चौकार लगावले होते.
दरम्यान स्मृती बाद झाल्यानंतर जेमीमा रॉड्रीक्स मैदानात आली आहे. त्यानंतर शफाली वर्माने देखील आपलं अर्धशतक पुर्ण केलं आहे. त्यानंतर ती वेगाने शतकाच्या दिशेने चालली होती. मात्र त्याच दरम्यान 87 धावांवर ती आऊट झाली. या खेळीत तिने 7 चौकार आणि 2 षटकार लगावले होते.यानंतर शफालीच्या मागोमाग जेमीमा रॉड्रीक्स देखील 24 धावांवर बाद झाली आहे. तिच्या पाठोपाठ कर्णधार हरमनप्रीत कौर देखील 20 धावांवर बाद झाली.
त्यानंतर दिप्ती शर्माने भारताचा डाव सावरत 58 धावांची खेळी केली. आणि तिला शेवटच्या क्षणी रिचा घोषणे 34 धावांची चांगली साथ दिली.अशाप्रकारे भारताने 7 विकेट गमावून 298 धावा केल्या होत्या. साऊथ आफ्रिकेकडून आयाबोंगा खाकाने 3, नोनकुलुलोको, नदीन डी क्लर्क आणि ट्रायनने प्रत्येकी 1-1 विकेट काढली होती.
