या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर क्रांती गौडने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिली 5 रनवरच आऊट झाली. पण त्यानंतर लिचफिल्डने एलिस पेरीच्या मदतीने भारताच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. क्रांती गौडला एक विकेट मिळाली असली तरी लिचफिल्ड आणि पेरीने क्रांतीच्या 5 ओव्हरमध्ये 49 रन काढल्या.
advertisement
जुन्या जखमा ताज्या झाल्या
याआधी 2003 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय बॉलिंगवर अशाचप्रकारे आक्रमण केलं होतं. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉण्टिंगने 121 बॉलमध्ये 140 रनची नाबाद खेळी केली, तर डॅमियन मार्टिन 84 बॉलमध्ये 88 रनवर नाबाद राहिला. ऍडम गिलख्रिस्टने 57 आणि मॅथ्यू हेडनने 37 रन केले होते. पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये फक्त 2 विकेट गमावून 359 रन केले आणि भारताने हा सामना तब्बल 125 रनने गमावला होता.
आता 23 वर्षांनंतर लिचफिल्डने रिकी पॉण्टिंगसारखीच खेळी केली आहे, त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा 23 मार्च 2003 च्या कटू आठवणी जाग्या झाल्या आहेत.
