TRENDING:

IND vs PAK : हॅरिस रौफसोबत राडा, मॅचनंतर अभिषेक शर्माचा सनसनाटी आरोप; म्हणाला 'पाकिस्तानने उगाच आमच्यावर...'

Last Updated:

India vs Pakistan, Asia Cup : जर तुम्ही पाहिलं तर कोणीही इतकं आक्रमक खेळत असेल, तर त्यामागे संघाचा पाठिंबा असतो, असं अभिषेक शर्मा म्हणाला अन् त्याने पाकिस्तानची खोड सांगितली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Abhishek Sharma On Haris Rauf : आशिया कपच्या (Asia Cup 2025) ग्रुप स्टेजमध्ये अपमान झाल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने भारताची खोड काढण्यासाठी अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि शुभमन गिल यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही छाव्यांनी पाकिस्तानला सडकून उत्तर दिलं. सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली अन् दणदणीत विजय मिळवला. अशातच मॅचमध्ये हॅरिस रौफसोबत (Haris Rauf) नेमका वाद काय झाला होता? यावर अभिषेक शर्माने उत्तर दिलं.
Abhishek Sharma On Haris Rauf
Abhishek Sharma On Haris Rauf
advertisement

काय म्हणाला अभिषेक शर्मा?

आजचा दिवस खूप साधा होता. पण पाकिस्तानचे खेळाडू ज्याप्रकारे काही कारण नसताना आमच्या अंगावर धावून आले, ते मला काही आवडलं नाही. म्हणूनच मी त्यांना बॅटने प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचे खेळाडू उगाच आमच्यावर येत होते, असं अभिषेक शर्मा म्हणाला आहे. जर तुम्ही पाहिलं तर कोणीही इतकं आक्रमक खेळत असेल, तर त्यामागे संघाचा पाठिंबा असतो. संघ माझ्यावर विश्वास ठेवतो आणि त्यामुळेच मी या इराद्याने मैदानात उतरतो. मी खूप मेहनत करत आहे आणि जर तो माझा दिवस असेल, तर मी तो माझ्या संघासाठी जिंकेनच, असंही अभिषेक म्हणाला.

advertisement

आम्ही शाळेतले दोस्त

अभिषेकने त्याचा सहकारी शुबमन गिलसोबतच्या शतकी भागीदारीबद्दलही सांगितलं. आम्ही शाळेच्या दिवसांपासून एकत्र खेळत आहोत. आम्हाला एकमेकांसोबत मॅच खेळायला मजा येते. आज आम्ही हे करून दाखवण्याचा विचार केला होता आणि तो दिवस आज होता. शुभमन गिल ज्या पद्धतीने त्यांना प्रत्युत्तर देत होता, ते पाहून मला खूप आनंद झाला, असंही अभिषेकने पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये म्हटलं.

advertisement

advertisement

कसा रंगला सामना?

दरम्यान, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 171 धावांचा उभ्या केल्या. यामध्ये पाकिस्तानचा सलामीवीर साहबजादा फरहान याने 58 धावांची खेळी केली. त्यानंतर कोणत्याही फलंदाजांना टीम इंडियाने मैदानात टिकू दिलं नाही. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाच्या सलामीवीरांनी सामना पारड्यात टाकला. शुभमन गिल आणि अभिषेके शर्मा यांनी शतकीय भागेदारी केली अन् टीम इंडियाला सुपर फोरमधील पहिला विजय मिळवून दिला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : हॅरिस रौफसोबत राडा, मॅचनंतर अभिषेक शर्माचा सनसनाटी आरोप; म्हणाला 'पाकिस्तानने उगाच आमच्यावर...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल