हराळवाडी गावातील शेतकरी ओंकार चौरे यांनी एका एकरात कांद्याची लागवड केली होती. पण सोलापूर जिल्ह्यात मागील 15 ते 20 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे कांदा पिकावर करपा रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. पाती खराब झाल्या असून पिवळ्या पडल्या आहेत. जेवढा कांद्याच्या लागवडीसाठी खर्च केला होता तेवढा खर्च निघणार नसल्याची खंत शेतकरी ओंकार चौरे यांनी व्यक्त केली.
advertisement
Weather Alert: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी धो धो कोसळणार, सोमवारी 26 जिल्ह्यांना अलर्ट
एक एकर कांदा लागवडीसाठी 80 हजार रुपयांपर्यंतचा खर्च ओंकार चौरे यांना आला होता. सतत पाऊस पडला नसता तर हा कांदा दहा ते बारा दिवसांत विक्रीसाठी बाजारात जाणार होता. एका एकरातून 100 पिशव्या कांदा निघणार होता. तर सर्व खर्च वजा करून कांदा विक्रीतून तरुण एक लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार होते. परंतु या पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले असून ओंकार यांनी पाहिलेल्या सर्व स्वप्नांचा चिखल झाला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी चौरे यांनी केलीये.