टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने गोलंदाजीला सूरूवात केली होती.यावेळी पहिल्याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर मोठी चूक घडली आहे. पाकिस्तानच्या साहिबजादाने मारलेला बॉल थेट बाऊंन्ड्री लाईनवर उभ्या असलेल्या अभिषेक शर्माच्या हातात गेला होता.पण त्याने हा महत्वाचा कॅच ड्रॉप केल्या.त्यानंतर हार्दिक पांड्या प्रचंड भडकला होता. त्यामुळे टीम इंडियाकडून मोठी चूक घडली.ही चूक टीम इंडियाला महागात पडणार आहे.
advertisement
साहिबजादा 4 धावांवर खेळत असताना त्याची कॅच ड्रॉप झाली होती.त्यामुळे तो आता या मिळालेल्या जीवनदानाचा किती फायदा घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान यानंतर दुसर्याच ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने फखर जमानची विकेट घेतली होती. फखर जमान विकेटमागे कॅच आऊट झाला. त्याने 15 धावा केल्या होत्या. त्याच्यानंतर आता मैदानात सयम अयुब आला आहे.
टॉस दरम्यान बोलताना सुर्यकुमार यादव म्हणाला, आम्ही प्रथम गोलंदाजी करू. खेळपट्टी छान दिसतेय आणि काल दव पडला होता. पहिल्या फेरीपासून आपल्याला वाटत होते की आपण बाद फेरीत खेळत आहोत, काहीही बदलले नाही. ती पूर्णपणे वेगळी खेळपट्टी होती (अबू धाबीमध्ये). अगदी सामान्य, फक्त दुसरा सामना. अर्शदीप आणि हर्षितसाठी बुमराह आणि वरुण परतले आहेत असे त्याने सांगितले.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा म्हणाला, मीही प्रथम गोलंदाजी केली असती.हा एक नवीन सामना आहे, नवीन आव्हान आहे. वातावरण अगदी सामान्य आहे. खेळपट्टी हळू दिसतेय. बॅट आणि बॉल दोन्हीने चांगली सुरुवात करायची आहे. दोन बदल. हसन नवाज आणि खुशदिल शाह खेळत नाहीत.
भारताची प्लेइंग इलेव्हन :
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमरा,
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन :
सैम अयुब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आघा (कॅप्टन), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (डब्ल्यू), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद