TRENDING:

लागोपाठ चौथ्या रविवारी भारताचा पाकिस्तानवर Surgical Strike, दुबईनंतर कोलंबोतही ऑपरेशन सिंदूर यशस्वी

Last Updated:

IND vs PAK आशिया कपच्या तीनही रविवारी भारताकडून मार खाल्ल्यानंतर आता चौथ्या रविवारीही टीम इंडियाने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोलंबो : आशिया कपच्या तीनही रविवारी भारताकडून मार खाल्ल्यानंतर आता चौथ्या रविवारीही टीम इंडियाने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. महिला वर्ल्ड कपच्या सामन्यात टीम इंडियाचा तब्बल 88 रननी विजय झाला आहे. भारताने दिलेलं 248 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानचा फक्त 159 रनवर ऑल आऊट झाला. यंदाच्या वर्ल्ड कपमधला टीम इंडियाचा हा दोन सामन्यांमधला दुसरा विजय आहे. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर क्रांती गौडलाही 3 विकेट मिळाल्या, याशिवाय स्नेह राणाने 2 विकेट घेतल्या. पाकिस्तानकडून सिद्रा आमिनने सर्वाधिक 81 रन केले, तर नटालिया परवेझने 33 आणि सिद्रा नवाझने 14 रन केले, या तिघींशिवाय कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूला दोन आकडी धावंख्याही करता आली नाही.
लागोपाठ चौथ्या रविवारी भारताचा पाकिस्तानवर Surgical Strike, दुबईनंतर कोलंबोतही ऑपरेशन सिंदूर यशस्वी
लागोपाठ चौथ्या रविवारी भारताचा पाकिस्तानवर Surgical Strike, दुबईनंतर कोलंबोतही ऑपरेशन सिंदूर यशस्वी
advertisement

या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर भारताचा 50 ओव्हरमध्ये 247 रनवर ऑल आऊट झाला. हरलीन देओलने भारताकडून सर्वाधिक रन केले. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करताना हरलीनने 65 बॉलमध्ये 46 रन केले. याशिवाय आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या रिचा घोषने 20 बॉलमध्ये नाबाद 35 रन करून भारताला या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. जेमिमा रोड्रिग्जने 32 तर प्रतिका रावलने 31 रनची खेळी केली. या सामन्यात टीम इंडियाच्या टॉप-8 पैकी कर्णधार हरमनप्रीत कौर (19 रन) वगळता प्रत्येक खेळाडूने 20 पेक्षा जास्त रन केले, पण एकालाही अर्धशतक करता आलं नाही.

advertisement

रेकॉर्ड अबाधित

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
यंदा 6 की 7 ऑक्टोबर कधी आहे कोजागिरी पौर्णिमा? पूजा विधी आणि संपूर्ण माहिती
सर्व पहा

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा पहिल्यांदाच ऑलआऊट झाला, पण भारताचं पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचं रेकॉर्ड अबाधित राहिलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या महिला टीममध्ये आतापर्यंत 12 वनडे मॅच झाल्या आहेत, यातल्या सर्व 12 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे. वर्ल्ड कपमध्ये दोन्ही महिला टीम 5 वेळा समोरासमोर आल्या आहेत, यातल्या सर्व 5 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे. पाकिस्तानच्या महिला टीमला भारताविरुद्ध एकदाही 200 रनचा टप्पा ओलांडता आलेला नाही, या सामन्यातही पाकिस्तानला भारतासमोर 200 रन करता आल्या नाहीत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
लागोपाठ चौथ्या रविवारी भारताचा पाकिस्तानवर Surgical Strike, दुबईनंतर कोलंबोतही ऑपरेशन सिंदूर यशस्वी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल