सीरिजच्या पहिल्या दोन्ही सामन्यात शतकं आणि शेवटच्या सामन्यात अर्धशतक केलेल्या विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. तर रोहित शर्माने या सीरिजमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात अर्धशतकं केली. सीरिजच्या सुरूवातीपासूनच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे कोच गौतम गंभीरसोबत खटके उडत असल्याची वृत्त समोर आली होती. विराट कोहली आणि रोहित शर्मा गौतम गंभीरसोबत बोलत नसल्याची चर्चाही सुरू होती, त्यातच आता टीम इंडियाने सीरिज जिंकल्यानंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
advertisement
सीरिज जिंकल्यानंतर विराट कोहली टीम इंडियातल्या सर्व सदस्यांसोबत हसत हस्तांदोलन करत होता, तर रोहित शर्मा समोर आल्यानंतर विराटने त्याला मिठी मारली. पण गौतम गंभीर समोर आल्यानंतर विराटच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव दिसले नाहीत, तसंच नुसतं हस्तांदोलन करून विराट पुढे निघून गेला.
भारताने मालिका जिंकली
रांचीमध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा विजय झाला, पण त्यानंतर रायपूरमध्ये झालेली दुसरी वनडे भारताने गमावली, त्यामुळे सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडियाला तिसरी वनडे जिंकणं गरजेचं होतं. या सामन्यात कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर भारतीय बॉलर्सनी दक्षिण आफ्रिकेला 270 रनवर ऑलआऊट केलं. कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या तर अर्शदीप सिंग आणि रवींद्र जडेजा यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डिकॉकने 106 रनची खेळी केली. या विजयासोबतच भारताने 3 वनडे मॅचची सीरिज 2-1 ने जिंकली आहे. आता दोन्ही टीममध्ये 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे.
