संजू सॅमसन याने काल 12 ओव्हरनंतर संघाची जबाबदारी स्विकारली अन् टीम इंडियाला एक बाजूने खेचून विजयापर्यंत पोहोचवलं. त्यावेळी संजूला डगआऊटमधून वारंवार सुचना मिळत होत्या. गंभीरने प्रॉपर प्लॅन तयार करून दिल्यानंतर संजूने त्यावर अंमलबजावणी केली अन् टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं. अशातच एकदा ओव्हर्सच्या दरम्यान रिंकु सिंग संजूसाठी निरोप घेऊन आला.
advertisement
गंभीरने रिंकु सिंग आणि कुलदीप यादव यांना मेसेज घेऊन पाठवलं. त्यावेळी संजूने बॅट रिंकुकडे दिली. रिंकूने बॅटला बगलत ठेवली अन् त्याला पाणी आणि टॉवेल दिला. संजूने घाम पुसून झाल्यावर गंभीरचा मेसेज ऐकला अन् बॅटिंग करायला निघाला पण याचवेळी त्याची बॅट घेऊन रिंकु डगआऊटकडे निघाला. आपल्या हातात काहीच नाही, याची जाणीव झाल्यावर संजू मागे फिरला अन् रिंकुला बॅट मागितली. त्यानंतर रिंकु आणि संजू या दोघांना हसू आवरलं नाही.
दरम्यान, हा सिन पाहून प्रेक्षकांना थेट रोहित शर्माची आठवण झाली. रोहित शर्माचा विसरभोळेपणा कुणाला माहिती नाही. प्रत्येक ठिकाणी रोहित काही ना काही विसरत असतो. अशातच आता संजूने नक्कीच त्याची जागा चालवली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
