TRENDING:

Shreyas Iyer : राजकारण की आणखी काही...? रेड बॉल क्रिकेटमधून अचानक ब्रेक का घेतला? श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केला खुलासा!

Last Updated:

Shreyas Iyer On Red ball cricket Break : सीसीआयने श्रेयसची विनंती मान्य देखील केली होती. मात्र, श्रेयस अय्यरने असा निर्णय का घेतला? यावर श्रेयसने पहिल्यांदाच खुलासा केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Shreyas Iyer breaks silence : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर श्रेयस अय्यर याने धमाकेदार खेळी केली अन् रोहित शर्मासोबत शतकीय भागेदारी केली. अशातच आता सामन्यानंतर श्रेयस अय्यर याने रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेक का घेतला? यावर खुलासा केला आहे.
Shreyas Iyer On Red ball cricket Break
Shreyas Iyer On Red ball cricket Break
advertisement

सहा महिन्यांचा ब्रेकची विनंती

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, श्रेयस अय्यरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) त्याच्या पाठीच्या आजारामुळे रेड-बॉल क्रिकेटमधून सहा महिन्यांचा ब्रेक घेण्याची औपचारिक विनंती केली. बीसीसीआयने त्याची ही विनंती मान्य देखील केली होती. मात्र, श्रेयस अय्यरने असा निर्णय का घेतला? यावर श्रेयसने पहिल्यांदाच खुलासा केला आहे.

माझी एनर्जी लेवल कमी होत होती

advertisement

जेव्हा मी रेड-बॉल क्रिकेटमध्ये परतलो (चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल नंतर), तेव्हा मला असे जाणवलं की काही ओव्हरपेक्षा जास्त फिल्डिंग केल्यानंतर माझी एनर्जी लेवल कमी होत होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकून राहण्यासाठी, तुम्हाला ती तीव्रता कायम ठेवावी लागते. आणि मला असं वाटलं की मी आंतरराष्ट्रीय स्तरावर आवश्यक असलेल्या तीव्रतेशी जुळवून घेऊ शकत नाही. म्हणून मी हा निर्णय घेतला आणि निवडकर्त्यांना कळवलं होतं, असं श्रेयस अय्यर याने म्हटलं आहे.

advertisement

दुसऱ्या दिवशी विश्रांतीचा दिवस

एकदिवसीय क्रिकेटमध्ये, तुम्हाला माहिती आहे की एक दिवस फिल्डिंग केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी विश्रांतीचा दिवस असतो, जेणेकरून तुम्ही आरामात बरे होऊ शकता. तो वेळ तुम्हाला कसोटीमध्ये मिळत नाही, असंही श्रेयसने म्हटलं आहे.

परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो

मुंबईतही जेव्हा आपण अतिरिक्त उसळी असलेल्या लाल मातीच्या पीचवर खेळतो तेव्हा सरळ भूमिका मदत करते. प्रत्येक पीच वेगळी असल्याने तुम्हाला सतत जुळवून घ्यावे लागते. मी आतापर्यंत अनेक वेळा माझं पीच बदलेलं आहे आणि मला वाटतं की मी सध्या कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो, असंही श्रेयस अय्यर म्हणाला आहे.

advertisement

दुसऱ्या सामन्यातील पराभव वेदनादायी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर वाढ आजही नाहीच, कांदा अन् मक्याला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

दरम्यान, श्रेयसने दुसऱ्या सामन्यातील पराभवावर देखील भाष्य केलं. अशा प्रकारे पराभव होणे निश्चितच वेदनादायी आहे. मला वाटते की पहिला सामना तितकासा विश्वासार्ह नव्हता कारण पावसाने महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला. पण या सामन्यात येताना, आमच्यासाठी निश्चितच करा किंवा मरो असा खेळ होता, असं श्रेयस म्हणाला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shreyas Iyer : राजकारण की आणखी काही...? रेड बॉल क्रिकेटमधून अचानक ब्रेक का घेतला? श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केला खुलासा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल