TRENDING:

Team India Qualification Scenario : थांबा! अजूनही टीम इंडिया वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये पोहचू शकते, कसं असेल समीकरण?

Last Updated:

Team India Womens Semifinal Qualification Scenario : वुमेन्स वर्ल्ड कप सेमीफायनलसाठी टीम इंडियाची पात्रताच्या अंतिम टप्प्यात आता समीकरण अधिक रोमांचक झालं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ICC Womens CWC 2025 Semifinal Scenario : आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचा सेमीफायनलमधील प्रवेश आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. ऑस्ट्रेलिया , इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकाया टीम्सनीआपले स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे चौथ्या जागेसाठी यजमान टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. टीम इंडियाने आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकल्यास त्यांचे 8 पॉईंट्स होतील आणि सेमीफायनलमधील प्रवेशाची सीट निश्चित होईल.
Team India Womens Qualification Scenario
Team India Womens Qualification Scenario
advertisement

न्यूझीलंडविरुद्धचा सामना आवश्यक

सध्या टीम इंडिया 4 पॉईंट्ससह गुणतालिकेत चौथ्या पोझिशनवर आहे, तर न्यूझीलंडचेही 4 पॉईंट्स असून त्यांचा नेट रन रेट (NRR) टीम इंडियापेक्षा कमी आहे. टीम इंडियाचा पुढील सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे आणि हा सामना एक प्रकारे व्हर्च्युअल क्वार्टर फायनल असणार आहे. हा सामना जिंकल्यास टीम इंडियाचे 6 पॉईंट्स होतील. यानंतरही टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये सहज प्रवेश मिळवण्यासाठी बांगलादेशविरुद्धचा सामनाही जिंकणं आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही 'जर-तर'च्या समीकरणात अडकावे लागणार नाही.

advertisement

पात्रतेसाठी आणखी एक ट्विस्ट

टीम इंडियाच्या पात्रतेसाठी आणखी एक ट्विस्ट आहे. जर टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवले आणि नंतर बांगलादेशकडून हरली, तर त्यांचे 6 पॉईंट्स होतील. अशा परिस्थितीत न्यूझीलंडने आपला शेवटचा सामना इंग्लंडला हरवून 6 पॉईंट्सपर्यंत मजल मारल्यास, सेमीफायनलमधील प्रवेशाचा निर्णय नेट रन रेटवर (NRR) अवलंबून राहील. सध्या टीम इंडियाचा नेट रन रेट अधिक चांगला असल्यामुळे त्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे, पण बांगलादेशविरुद्धच्या पराभवाने एनआरआरला धक्का बसू शकतो.

advertisement

दोन्ही सामने गमावले तर...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भाऊबीजची शॉपिंग करताय? 350 रुपयांत मिळतायत 3-पीस कॉटन ड्रेस, हे आहे लोकेशन
सर्व पहा

दरम्यान, या सर्व सिनेरिओमध्ये टीम इंडियासाठी सर्वात धोकादायक परिस्थिती म्हणजे दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करणे. जर असे झाले, तर टीम इंडिया केवळ 4 पॉईंट्ससह स्पर्धेतून बाहेर पडेल. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासाठी पुढील दोन्ही सामने 'करो या मरो'चे असणार आहेत. फॅन्सना आशा आहे की टीम इंडिया आपली ताकद दाखवून सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित करेल.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India Qualification Scenario : थांबा! अजूनही टीम इंडिया वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये पोहचू शकते, कसं असेल समीकरण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल