टी20 सीरीजमधून माघार
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडे असलेल्या पुराव्यामध्ये व्हिडिओ फुटेजचाही समावेश आहे. या घटनेनंतर अफगाणिस्तानने पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या ट्राय-नॅशनल टी20 सीरीजमधून माघार घेतली आहे. पाकिस्तान सरकारने हवाई हल्ल्यात क्रिकेटपटू मारले गेल्याचा इन्कार केल्यानंतर एसीबीचे हे विधान आले आहे.
पाकिस्तानविरुद्ध पुरावे आमच्याकडे
सादत यांनी एएनआयला (ANI) सांगितले, "या घटनेचा व्हिडिओ रिपोर्ट आमच्या मीडिया टीमने बनवला आहे आणि तो जगभरातील क्रिकेट बंधुत्वाने नक्कीच पाहिला असेल. हल्ला पाकिस्तानी राज्याने केला असल्याचे स्पष्ट पुरावे आमच्याकडे आहेत."
advertisement
शांततेचा संदेश देणारा खेळ
सादत यांनी पुढे म्हटले की, "क्रिकेट हा शांततेचा संदेश देणारा गेम आहे. क्रिकेटपटू हे शांततेचे दूत आहेत आणि त्यांना युद्धापासून दूर ठेवले पाहिजे. युद्धाचा खेळावर परिणाम होता कामा नये. त्यामुळे आम्ही सर्व क्रिकेट बोर्डांना आणि क्रिकेट बंधुत्वाला अशा अमानुष हल्ल्यांचा निषेध करण्याचे आणि क्रिकेटला युद्धापासून दूर ठेवण्याचे आवाहन करतो."
बीसीसीआयचा अफगाणिस्तानला पाठिंबा
या दुःखद घटनेनंतर इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल आणि बीसीसीआयनेही एसीबीला पाठिंबा दर्शवला आहे. "हा अफगाणिस्तानच्या क्रीडा समुदायासाठी, खेळाडूंसाठी आणि क्रिकेट कुटुंबासाठी एक मोठा लॉस आहे," असं एसीबीने स्पष्ट केलं आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड
दरम्यान, सध्या तरी, निर्णय फक्त तिरंगी मालिकेबद्दल घेण्यात आला आहे. भविष्यात, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड जो काही निर्णय घेईल तो राष्ट्रीय हिताचा विचार करूनच घेतला जाईल, असं देखील अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते सय्यद नसीम सादत यांनी म्हटलं आहे.