रणजी ट्रॉफीचे विजेतेपद
मिथुन मन्हास यांनी 1997 मध्ये दिल्लीकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ते देशांतर्गत क्रिकेटमधील एक अनुभवी आणि भरवशाचे बॅटर मानले जातात. 2007 मध्ये त्यांनी दिल्लीला रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले. त्या हंगामात त्यांनी 57.56 च्या सरासरीने 921 धावा केल्या होत्या. 157 प्रथम श्रेणी मॅचमध्ये त्यांनी 27 शतक आणि 49 अर्धशतकांसह 9714 धावा केल्या.
advertisement
आयपीएलमध्ये मिथुन मन्हास
मिथुन मन्हास यांनी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या टीम्सचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी कधीही भारतीय आंतरराष्ट्रीय टीममध्ये स्थान मिळवले नाही, कारण त्यांच्या काळात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांसारखे दिग्गज खेळाडू टीममध्ये होते.
सहायक कोच म्हणून काम
मिथुन मन्हास यांनी खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर कोचिंगमध्येही काम केले आहे. ते पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि गुजरात टायटन्ससाठी सहायक कोच म्हणून काम केले आहे. त्यांनी जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JKCA) मध्ये संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे आणि बीसीसीआयच्या बैठकांमध्ये जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या ते बीसीसीआय अध्यक्षपदासाठी एक सर्वमान्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहेत.