अमरावती: हिवाळ्याची चाहूल लागताच त्वचा कोरडी होण्यास सुरवात होते. त्याची योग्य काळजी घेतली नाही तर कोरडेपणा वाढतो आणि त्वचेला खाज सुटते. त्यातून नवनवीन त्वचेचे आजार निर्माण होतात. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. काहीवेळा आपण घरगुती उपाय करतो आणि त्यातून समस्या आणखी वाढतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत अमरावती येथील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी लोकल18 सोबत बोलताना महत्त्वाची माहिती दिलीये.