
छत्रपती संभाजीनगर : घरातील सगळ्यांची भूक भागवताना अनेक गृहिणी स्वतःच्या ताटात मात्र उरलेलेच अन्न घेतात. अन्नाची नासाडी नको किंवा बचतीची सवय यामुळे कालचा भात, भाजी किंवा पोळ्या दुसऱ्या दिवशी गरम करून खाण्याची पद्धत अनेक घरात दिसते. पण हीच सवय आरोग्यासाठी धोक्याची ठरू शकते. वारंवार शिळे अन्न खाल्ल्याने शरीरावर हळूहळू विपरीत परिणाम होऊ शकतो, शिळं अन्न हे शरीरासाठी स्लो पॉयझिनिंग ठरू शकते असा इशारा आहारतज्ज्ञ डॉ. शिवाजी जाधव यांनी दिला आहे.