मराठा समजातील कुणबी नोंदीसंदर्भात राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशावर मंत्री छगन भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. सरकारचा हा निर्णय म्हणजे आरक्षणातून ओबीसीतील इतर जातींना बाहेर ढकलण्याचा प्रकार असल्याची टीका भुजबळांनी केलीय. त्यामुळे शिंदे सरकारमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आलीय.