
नाशिक : आजच्या तरुण पिढीला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा देणारी एक कहाणी नाशिकमधून समोर आली आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या आणि काही वर्षे नोकरी केलेल्या सक्लिन मिर्झा या तरुणाने वेळेवर आणि अपेक्षित प्रगती होत नसल्याचे पाहून हातची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. वडिलांनी सुरू केलेला राज मिसळचा व्यवसाय पुढे नेऊन सक्लिनने आज एक मोठे यश संपादन केले आहे.
Last Updated: December 11, 2025, 14:42 ISTजालना : महाराष्ट्रामध्ये विविध भागांमध्ये सध्या ऊस लागवडीचा हंगाम जोरात सुरू आहे. उसाची लागवड करत असताना पूजा करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये या पूजेला वेगवेगळी नावे आहेत. काही भागात ओटी भरणे, काही भागात गणपतीची पूजा तर काही भागात गुढी उभारणे असं म्हटलं जातं.
Last Updated: December 11, 2025, 16:52 ISTकल्याण : मार्गशीर्ष महिना सुरू झाला की मार्केट भरगच्च भरतात. देवीच्या मुखवट्यापासून सजावटीपर्यंत महिलांचीही या व्रत-उपवासासाठी लगबग सुरू असते. मार्केटमध्ये या वेळेत अनेक शॉपमध्ये वेगवेगळ्या वस्तू ज्या आकर्षित करत असतात. उद्यापनाला लागणाऱ्या वस्तू स्वस्त आणि मस्त असतील तर लोक तिकडे खरेदीला वळतात आणि यावेळी कमी भावात वस्तू मिळणे मुश्किल असते. मात्र तुम्ही कल्याणमधील मोहन मार्केटमध्ये पारस नोव्हेल्टी इथे फक्त 10 रुपयांपासून वस्तू खरेदी करू शकता.
Last Updated: December 11, 2025, 16:02 ISTनाशिक - नाशिक शहरातील खाद्यसंस्कृती ही सर्वत्र प्रसिद्ध आहे. येथील अनेक खाद्यपदार्थ लोकप्रिय होत आहेत. यातच म्हणजे येथील मिसळसुद्धा आता सर्वत्र प्रसिद्ध आहे. आता शहरात शेकडो ठिकाणी मिसळ विक्री केली जात आहे. यामध्ये एक व्यक्ती अशी आहे, जे 1974 पासून म्हणजे तब्बल 50 वर्षांपासून मिसळविक्रीचा व्यवसाय करत आहेत. ओम बजरंग मिसळ असे या मिसळचे नाव आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला आढावा.
Last Updated: December 11, 2025, 15:33 ISTपुणे : प्रत्येक व्यक्तीकडे एखादी ना एखादी कला दडलेली असते. परंतु त्या कलेला योग्य दिशा, सातत्य आणि निसर्गाशी असलेले नाते मिळाले तर ती एक वेगळीच ओळख निर्माण करू शकते. पुण्यातील सहकारनगर परिसरात राहणारे गौतम वैष्णव हे असेच एक नाव. निसर्गाच्या सान्निध्यात दगडांच्या समतोलातून आकर्षक शिल्पनिर्मिती करणारी त्यांची रॉक बॅलन्सिंग ही कला आज देशभरात लोकप्रिय झाली आहे. या कलेला भारतात मोठ्या प्रमाणावर पोहोचविण्यात गौतम यांचा मोठा वाटा असून, अनेकांना मानसिक स्थैर्याचा आणि निसर्गाशी बंध दृढ करण्याचा नवा मार्ग त्यांनी दाखवला आहे.
Last Updated: December 11, 2025, 15:02 IST