
छत्रपती संभाजीनगर : हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. हिवाळा म्हटलं की सर्वत्र थंडी असतेच आणि थंडी पडली की आपल्या शरीर देखील थंड होतं. तर हिवाळ्यामध्ये शरीर उष्ण ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ खात असतो. पण यामध्ये सर्वात महत्त्वाचे असते म्हणजे तीळ खाणं. कारण तीळ हे उष्ण असतात. तर हिवाळ्यामध्ये तीळ खाण्याचे आपल्या शरीर काय फायदे होतात? याविषयी आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.