छत्रपती संभाजीनगर : सध्याला सर्वत्र कडाक्याचे ऊन पडत आहे. अशातच आपण जर कुठे बाहेर गेलो तर शरीर थंड होण्यासाठी आपण हमखास रसवंतीवरती रस हा घेत असतो. पण हा रस आपण किती प्रमाणात घ्यावा किंवा त्याचे प्रमाण किती असावे? त्यासोबतच उसाचा रस कोणी घ्यावा किंवा कोणी घेऊ नये? या सगळ्याविषयीच आपल्याला आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी माहिती सांगितलेली आहे.\r\n