
जालना : राज्यात अगदी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडला. यामुळे शेतीची अनेक गणितं देखील बिघडली आहेत. रब्बी हंगाम लांबला असून कोरडवाहू पेरणीची तारीख देखील संपली आहे. परंतु, अशाही परिस्थितीत शेतकरी नवीन हंगामासाठी तयार झाले असून रब्बी पेरणी करताना पहायला मिळत आहे. हरभरा हे राज्यातील प्रमुख रब्बी पीक आहे. यंदा लांबलेल्या हंगामात हरभरा पिकाचे कोणकोणते विकसित वाण आहेत? याबद्दल लोकल18 ने कृषी तज्ज्ञ एस. व्ही. सोनुने यांच्याकडून माहिती घेतली.