
संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीदरम्यान मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. भाजपाने तीन सदस्य पळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला. यावेळी दानवे यांनी भाजप सदस्यांची कॉलर पकडल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला.