
महाराष्ट्रात मतदानादरम्यान अनेक ठिकाणी बोगस मतदान झाले. अनेक ठिकाणी पैसे वाटप झाले. या सगळ्यात काही ठिकाणी गोंधळ तर काही ठिकाणी राडा झाला.
Last Updated: Jan 15, 2026, 20:23 ISTअनेक ठिकाणी मतदान यादीत घोळ झाल्याचं महाराष्ट्राच्या या आजच्या मतदानादरम्यान झालं. तसेच चक्क वन मंत्री गणेश नाईकांचंच यादीतून नाव गायब झाले. त्यांमुळे सामान्य नागरिकांचं किती हाल होऊ शकतात हे दिसून आले. त्यावरुन आता सगळीकडे खळबळ उडाली आहे. तसेच गणेश नाईकांनी सिस्टीम अपयशी झाल्याचे म्हटले आहे.
Last Updated: Jan 15, 2026, 20:40 ISTराज्यात मतदानादरम्यान राडेच राडे झाले. अनेक ठिकाणी हाणामाऱ्या झाल्या, तर काही ठिकाणी जाळपोळ झाली. कधी बोगस मतदानावरुन तर कधी बाचाबाची वरुन वाद विकोपाला गेले.
Last Updated: Jan 15, 2026, 19:06 ISTमतदानानंतर शाई पुसली जात असल्याचा आरोप मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांनी केला आहे. असे प्रकार करायचे असतील तर निवडणुक घेता कशाला असं त्या संतापाने म्हणाल्या आहेत.
Last Updated: Jan 15, 2026, 18:39 ISTजळगावात शिवसेनेचे कार्यकर्ते वसंत सोनवणे यांना मारहाण करण्यात आली आहे. तेव्हा त्यांच्या हाथाला आणि पायाला जखम झाली. अपक्ष उमेदवारांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Last Updated: Jan 15, 2026, 18:21 IST