
'बघतोय रिक्षवाला' या स्पेशल शो च्या भागात मानखुर्दमधील सामान्य नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. या व्यथा मात्र नेते मंडळींना खूपच झोंबणाऱ्या आहेत. या शो मधून कोणत्या पक्षाला आणि कोणत्या नेत्याला जनता मनापासून मत देईल याचा कल समजणार आहे. विशेष म्हणजे महिलांनी यावर जास्त मतं मांडली आहेत.
Last Updated: Jan 03, 2026, 15:59 ISTशिवसेना ठाकरे गट आणि मनसे हे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. तर, दुसरीकडे भाजप-शिवसेना शिंदे गटानेही आक्रमक प्रचाराला सुरुवात केली आहे. या महापालिका निवडणुकीत शिवसेना कोणाची यावर मुंबईकरांचा कौल दिसून येणार आहे. ठाकरे बंधूंची युती आणि शिवसेना शिंदे गट हे ८७ जागांवर एकमेकांविरोधात लढणार आहेत. यातील बहुसंख्य जागा या मराठीबहुल भागातील आहेत. त्यात ६९ मतदारात ठाकरे-शिंदे एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेत ठाकरेंची अग्निपरीक्षा असणार आहे.
Last Updated: Jan 05, 2026, 20:13 ISTबीड : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक नागरिक पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. दिवसभर कामाचा ताण, बाहेरचे अन्न आणि अनियमित दिनचर्या यामुळे शरीराला आवश्यक असलेले पाणी पुरेशा प्रमाणात घेतले जात नाही. परिणामी पाणी कमी पिण्याची सवय हळूहळू गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पाणी ही केवळ तहान भागवण्यासाठीची गरज नसून शरीरातील प्रत्येक अवयवाच्या कार्यासाठी अत्यावश्यक घटक आहे, असं आरोग्य तज्ज्ञ राहुल वेताळ यांनी सांगितलं
Last Updated: Jan 05, 2026, 19:57 ISTकालच भाजपचे खासदार नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिले होते. पण त्यांनी आता यावरील मौन सोडले आहे. त्यांनी यू टर्न घेतला आहे. ते म्हणाले, माझे वाक्य तसं नव्हते. खूप कटकारस्थानं झाली.दोन्ही मुलं चांगली आहेत.नांदा सौख्य भरे. आता आपण घरी बसायचं. निवृत्ती घेतो असं नाही म्हणालो
Last Updated: Jan 05, 2026, 19:41 ISTशिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी भाजपचे राणाजगजितसिंह पाटलांवर हल्लाबोल केला आहे. त्यांना तुळजापुर नगराध्यक्ष केले आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांनी त्यांच्यावर टीका करत म्हणाले, "भक्तांना आता ड्रग्जची पुडी देतील.. "
Last Updated: Jan 05, 2026, 19:24 ISTसोलापूर : महिलांवर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अत्याचारांच्या घटना लक्षात घेऊन सोलापूर शहरातील संगमेश्वर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय दोन मुलींनी वूमन सेफ्टी शूज बनवले आहे. आरती पाटील आणि स्नेहा राठोड या दोन तरुणींनी हे शूज बनवले आहे. शूज परिधान करणाऱ्या महिलेला व्यक्तीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्याला विजेचा जोरदार धक्का बसतो आणि जवळपास चार तास बेशुद्ध होतो. या संदर्भात अधिक माहिती आरती पाटील यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.
Last Updated: Jan 05, 2026, 19:24 IST