
कल्याण डोंबिवली: गेल्या 16 वर्षांपासून सुप्रिया यांनी सुरू केलेला पाळणाघर नोकरदार महिलांसाठी महत्त्वाचे पॉइंट ठरले आहे. ज्या महिला सुशिक्षित आहेत, त्यांना त्यांच्या लहान मुलांमुळे बाहेर पडता येत नाहीत. अशा महिलांना सुप्रिया यांच्या पाळणाघराने चांगलाच दिलासा मिळाला आहे. मुख्य म्हणजे ज्या मुलांना महागड्या ट्रिटमेंट करून सुद्धा बोलता येत नव्हतं अशा मुलांना या घराणं बोलक बनवले. शिवाय, अपंग मुलांना चालायला अधिक क्रियाशील बनवले आहे.
Last Updated: December 17, 2025, 14:41 ISTसावंतवाडीची पारंपरिक कलाकुसर आणि सागवान लाकडाच्या समृद्ध वारशाची ओळख जपत “आम्ही सावंतवाडीकर” या स्थानिक ब्रँडने ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. शुद्ध सागाच्या लाकडापासून तयार करण्यात आलेली खेळणी, घरगुती वापरातील वस्तू आणि अँटिक शो पीस यांची मोठी श्रेणी या ब्रँडखाली उपलब्ध असून, उत्कृष्ट गुणवत्ता, टिकाऊपणा आणि कलात्मक नक्षीकाम यामुळे या वस्तूंना मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे या सागवानी वस्तूंच्या किंमती केवळ 60 रुपयांपासून सुरू होत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांनाही त्या सहज परवडणाऱ्या ठरत आहेत.
Last Updated: December 17, 2025, 15:34 ISTमुंबई: अलीकडेच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या ‘धुरंदर’ चित्रपटातील अक्षय खन्नाचं एक गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्यातील त्याचा डान्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतानाच, अक्षय खन्नाचा ब्लॅक रंगाच्या शेरवानीतील रॉयल लुक देखील चर्चेत आला आहे.
Last Updated: December 17, 2025, 15:02 ISTपुणे: मेळघाटातील आदिवासी बोलीभाषा, संस्कृती आणि लोकजीवनाचा अद्वितीय प्रवास उलगडणारे भव्य प्रदर्शन यंदा पुणे राष्ट्रीय पुस्तक महोत्सवात नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. मेळघाट येथील राईस फाउंडेशनच्या वतीने भगवान बुद्धांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एफ.सी. महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीसमोर भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात आदिवासी भाषांचा आदिम काळापासून ते आधुनिक एआय तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. या विषयीची अधिक माहिती जाणून घेऊ
Last Updated: December 17, 2025, 14:34 ISTबीड : बीड जिल्ह्यातील नित्रुड गावचा तरुण प्रवीण पवार याने शिक्षण घेत असतानाच शेतीतून उल्लेखनीय यश मिळवून दाखवले आहे. सध्या कृषी विषयक पदवीचे शिक्षण घेत असलेला प्रवीण पवार अवघ्या दीड एकर क्षेत्रामध्ये कांदा लागवड करून एकाच हंगामात प्रतिवर्षी साडेतीन ते चार लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा कमावत आहे. ग्रामीण भागातील तरुणांसाठी त्याचा हा प्रयोग प्रेरणादायी ठरत असून शेतीतूनही आर्थिक स्थैर्य मिळू शकते, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे.
Last Updated: December 17, 2025, 13:37 IST