
साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नवनिर्वाचित नगरसेवकांचं अभिनंदन करण्यात आले. तेव्हा ते म्हणाले,"सातारा जिल्ह्यामध्ये इतकं प्रचंड यश हे भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदाच प्राप्त झालं आहे. या सातारा जिल्ह्याने इतर सगळ्या पक्षाला भूईसपाटच केले आहे. अशा प्रकारची निवडणुक या आधी कधीच पाहायला मिळाली नाही."