
सोलापूर : पाणी हेच जीवन या उक्तीचा प्रत्यय देणारा आदर्श उपक्रम सोलापुरातील हराळवाडी गावात राबविण्यात आला आहे. गावातील जागरूक ग्रामस्थ माऊली हेगडे यांनी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक नळांमधून वाया जाणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा हराळवाडी पॅटर्न उभा केला आहे. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे.