नेमका दावा काय होता?
'वन अमेरिका न्यूज नेटवर्क' (OANN) या अमेरिकन चॅनेलवर एका मुलाखतीदरम्यान माजी अमेरिकन लष्करी कर्नल डगलस मॅकग्रेगर यांनी खळबळजनक विधान केले होते. "अमेरिकेचे स्वतःचे तळ आणि बंदरे उद्ध्वस्त झाली आहेत, त्यामुळे आता आम्हाला भारतीय बंदरांवर अवलंबून राहावे लागत आहे," असा दावा त्यांनी केला होता. मॅकग्रेगर यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण झाला होता.
advertisement
परराष्ट्र मंत्रालयानं काय म्हटलं?
MEA च्या फॅक्ट चेक टीमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करून या वृत्ताचे खंडन केले. "ही बातमी पूर्णपणे खोटी (Fake News) आहे. भारतीय बंदरांचा अमेरिकन नौदलाकडून वापर केला जात असल्याच्या टिप्पण्या बेजबाबदार आणि जाली आहेत. नागरिकांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने अशा अफवांना बळी पडू नये," असे परराष्ट्र खात्यानं सांगितले.
भारताची भूमिका काय?
परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, भारत या युद्धात कोणत्याही गटात सामील नाही. भारत आपली जमीन, बंदरे किंवा हवाई क्षेत्र लष्करी कारवायांसाठी कोणालाही वापरू देत नाही. या युद्धामुळे आखाती देशात राहणाऱ्या सुमारे एक कोटी भारतीय नागरिकांची सुरक्षा, भारताचा व्यापार आणि ऊर्जा पुरवठा साखळी (Energy Supply Chain) धोक्यात आली आहे. त्यामुळे भारताने नेहमीच मुत्सद्देगिरी आणि चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे.
