TRENDING:

Iran Israel : भारतीय बंदरातून इराणवर अमेरिकेचे क्षेपणास्त्र हल्ले? परराष्ट्र मंत्रालयाने अखेर सगळंच सांगितलं...

Last Updated:

Israel Iran Conflict : राण-अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय बंदरांचा वापर केला जात असल्याचा दावा अमेरिकन माध्यमातून सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय बंदरांचा वापर केला जात असल्याचा दावा अमेरिकन माध्यमातून सुरू आहे. या दाव्यानंतर देशभरात प्रतिक्रिया उमटू लागल्या. अशातच आता या मुद्यावर भारताच्या परराष्ट्र खात्याने भूमिका स्पष्ट केली. भारताच्या परराष्ट्र खात्यानं हा दावा फेटाळून लावला असून असले वक्तव्ये निराधार असल्याचे भाष्य केले आहे.
भारतीय बंदरातून इराणवर अमेरिकेचे क्षेपणास्त्र हल्ले? परराष्ट्र मंत्रालयाने अखेर सगळंच सांगितलं...
भारतीय बंदरातून इराणवर अमेरिकेचे क्षेपणास्त्र हल्ले? परराष्ट्र मंत्रालयाने अखेर सगळंच सांगितलं...
advertisement

नेमका दावा काय होता?

'वन अमेरिका न्यूज नेटवर्क' (OANN) या अमेरिकन चॅनेलवर एका मुलाखतीदरम्यान माजी अमेरिकन लष्करी कर्नल डगलस मॅकग्रेगर यांनी खळबळजनक विधान केले होते. "अमेरिकेचे स्वतःचे तळ आणि बंदरे उद्ध्वस्त झाली आहेत, त्यामुळे आता आम्हाला भारतीय बंदरांवर अवलंबून राहावे लागत आहे," असा दावा त्यांनी केला होता. मॅकग्रेगर यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण झाला होता.

advertisement

परराष्ट्र मंत्रालयानं काय म्हटलं?

MEA च्या फॅक्ट चेक टीमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करून या वृत्ताचे खंडन केले. "ही बातमी पूर्णपणे खोटी (Fake News) आहे. भारतीय बंदरांचा अमेरिकन नौदलाकडून वापर केला जात असल्याच्या टिप्पण्या बेजबाबदार आणि जाली आहेत. नागरिकांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने अशा अफवांना बळी पडू नये," असे परराष्ट्र खात्यानं सांगितले.

advertisement

advertisement

भारताची भूमिका काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; 30 रुपयांपासून खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट
सर्व पहा

परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, भारत या युद्धात कोणत्याही गटात सामील नाही. भारत आपली जमीन, बंदरे किंवा हवाई क्षेत्र लष्करी कारवायांसाठी कोणालाही वापरू देत नाही. या युद्धामुळे आखाती देशात राहणाऱ्या सुमारे एक कोटी भारतीय नागरिकांची सुरक्षा, भारताचा व्यापार आणि ऊर्जा पुरवठा साखळी (Energy Supply Chain) धोक्यात आली आहे. त्यामुळे भारताने नेहमीच मुत्सद्देगिरी आणि चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
Iran Israel : भारतीय बंदरातून इराणवर अमेरिकेचे क्षेपणास्त्र हल्ले? परराष्ट्र मंत्रालयाने अखेर सगळंच सांगितलं...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल